शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
5
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
6
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
7
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
8
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
9
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
10
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
11
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
12
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
13
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
14
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
15
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
16
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
17
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
18
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
19
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
20
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

लहान असो वा मोठे सर्वांचाच भ्रष्टाचार घातक

By admin | Updated: May 7, 2014 03:24 IST

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा राबविताना ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आहे असा अधिकारी खालच्या पदावर आहे की वरिष्ठ पदावर हा निकष पूर्णपणे गैरलागू ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

 सुप्रीम कोर्टाची सरकारला चपराक : कायदा राबविताना अधिकार्‍यांची वर्गवारी चुकच

नवी दिल्ली: देशातील भ्रष्टाचाराच्या कुप्रवृतीविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी संसदेने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा केलेला आहे. त्यामुळे हा कायदा राबविताना ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आहे असा अधिकारी खालच्या पदावर आहे की वरिष्ठ पदावर हा निकष पूर्णपणे गैरलागू ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायालय म्हणते की, सरकारी अधिकारी खालच्या पदावरील असो अथवा वरिष्ठ पदावरील, त्याने केलेल्या भ्रष्टाचाराने संपूर्ण शासन यंत्रणाच भ्रष्ट होत असते. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी कायदा राबविताना अधिकार्‍यांची त्यांच्या हुद्द्यानुरुप वर्गवारी करणे सर्वस्वी चुकीचे आहे. भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे व भ्रष्टाचार करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना हुडकून काढून त्यांना दंडित करणे हाच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे अधिकार्‍यांचे असे असमर्थनीय वर्गीकरण कायद्याच्या कठोरतेस बाधा आणणारे आहे. पूर्वसंमती घेण्याच्या या बंधनातील आणखी एका दोषावर बोट ठेवताना घटनापीठाने म्हटले की, संशयीत आरोपीला सुगावाही लागणार नाही अशा पद्धतीने तपास करून माहिती गोळा करणे हे चातुर्याने केल्या जाणार्‍या पोलिसी तपासाचे खरे इंगीत असते. पण प्राथमिक तपासासाठीही सरकारची पूर्वसंमती घेण्याच्या या बंधनाने संबंधित अधिकार्‍यांना होऊ घातलेल्या चौकशीची आधीच कुणकुण लागून सारवासारव करण्याचा त्यांना अवधी मिळतो. शिवाय करण्यात आलेल्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आहे की नाही याचीही शहानिशा सीबीआयला करू न देणे ही फौजदारी कायद्याने दिलेल्या स्वतंत्र व नि:पक्ष तपासाच्या अधिकारावर गदा आहे. शिवाय राज्य सरकारच्या पोलिसांवर असे बंधन नाही. हेच अधिकारी जेव्हा राज्य सरकारच्या सेवेत असतात तेव्हा त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची तेथील पोलीस विनासंमती चौकशी करू शकतात. मग एकट्या सीबीआयवर असे बंधन घालणे हा पक्षपात आहे, असेही न्यायालयाने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

एकदा फटकारले तरी पुन्हा तेच

> ४वर्ष २००३ मध्ये कायदा दुरुस्ती करून हे कलम कायद्यात अंतर्भूत केले जाण्यापूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासकीय निर्देशांच्या स्वरूपात हेच बंधन सीबीआयला लागू होते. त्यास ‘सिंगल डायरेक्टिव्ह’ असे म्हटले जायचे.

>विनीत नारायण यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने डिसेंबर १९९७ मध्ये ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले. तरी सरकारने पुन्हा कायद्याच्या स्वरूपात पुन्हा हेच बंधन सीबीआयवर लादले.

>विनीत नारायण प्रकरणात जो बचाव फेटाळला गेला होता तोच बचाव आताही सरकारने केला.