शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘इसिस’साठी ६ भारतीय ठार

By admin | Updated: November 24, 2015 03:15 IST

पॅरिसपासून बांगलादेशपर्यंत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करून जगभर कमालीच्या तिरस्काराचा विषय बनलेल्या ‘इस्लामिक स्टेट’साठी सीरिया आणि इराकमध्ये लढताना भारतातून गेलेल्या

गुप्तहेरांची माहिती : कल्याणच्या टंकीचाही मृतांमध्ये समावेश; २३ भारतीय बनले ‘जिहादी’नवी दिल्ली : पॅरिसपासून बांगलादेशपर्यंत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करून जगभर कमालीच्या तिरस्काराचा विषय बनलेल्या ‘इस्लामिक स्टेट’साठी सीरिया आणि इराकमध्ये लढताना भारतातून गेलेल्या सहा ‘जिहादीं’चा मृत्यू झाल्याची माहिती पाश्चात्त्य गुप्तहेर संघटनांकडून मिळाली आहे.या माहितीनुसार, आत्तापर्यंत एकूण २३ भारतीय ‘इसिस’मध्ये सामील झाले असून, त्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडून ‘जिहादी’ होण्यासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी १७ जणांना गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांत गुप्तहेर संघटनांनी वेळीच रोखले आहे.पाश्चात्त्य गुप्तहेर संघटनांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा भारतीय ‘इसिस’साठी लढताना ठार झाले आहेत- अतिफ वसीम मोहम्मद (आदिलाबाद, तेलंगण), मोहम्मद उमर सुभान (बंगळुरू, कर्नाटक), मौलाना अब्दुल कादिर सुलतान आरमार (भटकळ, कर्नाटक), शाहीम फरूख टंकी (कल्याण, महाराष्ट्र), फैज मसूद (बंगळुरू, कर्नाटक) आणि मोहम्मद साजिद उर्फ बडा साजिद (आझमगढ, उत्तर प्रदेश). याखेरीज ‘इस्लामिक स्टेट’विषयी सहानुभूती असणाऱ्यांनी टिष्ट्वटरवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या जुलैमध्ये ‘इसिस’साठी लढताना दोन भारतीय सीरियात ठार झाले आहेत. हे दोघे वरील सहापैकी आहेत की आणखी वेगळे आहेत, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)अविश्वास आणि दुय्यम वागणूकगुप्तहेर संघटनांच्या माहितीनुसार, भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांसह दक्षिण आशियाई देशांतून तसेच नायजेरिया व सुदान यांसारख्या आफ्रिकी देशांतून आलेल्यांना ‘इसिस’ कट्टर मुसलमान मानत नाही. त्यामुळे अरब वंशाच्या ‘जिहादीं’हून त्यांना हलके मानून दुय्यम वागणूक दिली जाते. पगार, निवासस्थाने, शस्त्रे व दारूगोळा आणि पद व हुद्दे अशा सर्वच बाबतींत दक्षिण आशियाई व आफ्रिकन ‘जिहादीं’ना अरब ‘योद्ध्यां’च्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जाते.दक्षिण आशिया व आफ्रिकी देशांतून आलेले ‘जिहादी’ कुरआन व हादिथच्या शिकवणुकीनुसार कट्टर ‘इस्लाम’चे पालन करीत नसल्याने कोणतीही जबाबदारी देण्यापूर्वी त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते व सलाफी जिहादचे भूत त्यांच्या डोक्यात ठासून भरले जाते; शिवाय पळपुटेपणा करून या लोकांनी स्वदेशी परत जाऊ नये यासाठी इराक / सीरियात आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पासपोर्ट जाळून टाकले जातात.मृत्यूच्या दाढेत ढकलले जातेगुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, भारत व इतर दक्षिण आशियाई देशांतून जाणाऱ्यांची संख्या अरब देशांतून आलेल्यांहून कितीतरी कमी असली तरी मरण पावणाऱ्यांमध्ये अरब ‘जिहादीं’ची संख्या तुलनेने कमी दिसते. याचे कारण असे की प्रत्यक्ष ‘युद्ध’भूमीवर या ‘दुय्यम मुस्लिमां’ना आघाडीची फळी म्हणून मृत्यूच्या दाढेत आधी ढकलले जाते व अधिक सुसज्ज शस्त्रसामग्री असलेले अरब ‘योद्धे’ दुसरी फळी सांभाळतात. शिवाय आशियाई व आफ्रिकी ‘सैनिकां’ना बऱ्याच वेळा फसवून ‘शहीद’ केले जाते, अशीही माहिती मिळते. म्हणजे असे की, या लोकांना स्फोटकांनी भरलेले वाहन देऊन ठरावीक ठिकाणी जायला व तेथे गेल्यावर ठरावीक नंबरवर फोन करण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात तो नंबर फिरविला की आधीपासून केलेल्या व्यवस्थेने स्फोटकांचा स्फोट होऊन या ‘जिहादीं’सह ठरलेले लक्ष्य उद््ध्वस्त होते.