शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

आदर्श नगरातील सहा घरे पाण्यात भिंत फोडून काढले पाणी : रात्रभर जागरण, कमरेपर्यंत पाण्याने उडविली झोप

By admin | Updated: June 25, 2016 23:04 IST

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.
आदर्श नगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये सहा घरे आहेत. शुक्रवारी रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर या भागाच्या वरील परिसरातील पाण्याचा प्रवाह येथे आल्याने व त्यात नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याला जायला जागा नसल्याने हे पाणी थेट या सहा घरांच्या कुंपणामध्ये व त्यानंतर ते सहाही घरांमध्ये शिरले. कंुपणामध्ये कमरेपर्यंत पाणी जमा झाल्याने पाणी काढावे कसे असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला. त्यात घरातही पाण्याची पातळी वाढू लागल्याने अखेर प्रताप चव्हाण यांनी कुंपणाच्या बाहेर जाऊन भिंतीला छिद्र पाडले व पाणी वाहते केले. त्यानंतर घरातील पाणी काढण्यासाठी रात्री एक वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत रहिवाशांना जागरण करावे लागले.
आदर्श नगरातील साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांच्या घरामध्ये पाणी शिरले. या सहाही घरांमधील सोफा, फर्निचर व इतर साहित्य पाण्यात सापडून ओले झाले तसेच कोणाची पाण्याची मोटार, छोटी चक्की यांचेही नुकसान झाले. रात्री नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण हे तेथे थांबून होते.

या भागातही फटका....
-समतानगरमध्ये एका घरात पाणी शिरल्याने घरात चिखलही साचला होता.
- इच्छादेवी मंदिरात शिरले पाणी
- प्रेमनगरात वीज तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित
- बजरंग पूल पाण्याखाली
- श्रीधर नगर जवळील नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वाघ नगरचा पहाटेपर्यंत संपर्क तुटला
-बजरंग पूल ते एसएमआयटी महाविद्यालय परिसराचाही पहाटेपर्यंत संपर्क तुटला.