शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नगरातील सहा घरे पाण्यात भिंत फोडून काढले पाणी : रात्रभर जागरण, कमरेपर्यंत पाण्याने उडविली झोप

By admin | Updated: June 25, 2016 23:04 IST

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.
आदर्श नगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये सहा घरे आहेत. शुक्रवारी रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर या भागाच्या वरील परिसरातील पाण्याचा प्रवाह येथे आल्याने व त्यात नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याला जायला जागा नसल्याने हे पाणी थेट या सहा घरांच्या कुंपणामध्ये व त्यानंतर ते सहाही घरांमध्ये शिरले. कंुपणामध्ये कमरेपर्यंत पाणी जमा झाल्याने पाणी काढावे कसे असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला. त्यात घरातही पाण्याची पातळी वाढू लागल्याने अखेर प्रताप चव्हाण यांनी कुंपणाच्या बाहेर जाऊन भिंतीला छिद्र पाडले व पाणी वाहते केले. त्यानंतर घरातील पाणी काढण्यासाठी रात्री एक वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत रहिवाशांना जागरण करावे लागले.
आदर्श नगरातील साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांच्या घरामध्ये पाणी शिरले. या सहाही घरांमधील सोफा, फर्निचर व इतर साहित्य पाण्यात सापडून ओले झाले तसेच कोणाची पाण्याची मोटार, छोटी चक्की यांचेही नुकसान झाले. रात्री नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण हे तेथे थांबून होते.

या भागातही फटका....
-समतानगरमध्ये एका घरात पाणी शिरल्याने घरात चिखलही साचला होता.
- इच्छादेवी मंदिरात शिरले पाणी
- प्रेमनगरात वीज तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित
- बजरंग पूल पाण्याखाली
- श्रीधर नगर जवळील नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वाघ नगरचा पहाटेपर्यंत संपर्क तुटला
-बजरंग पूल ते एसएमआयटी महाविद्यालय परिसराचाही पहाटेपर्यंत संपर्क तुटला.