शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

सहा आरोपींना राष्ट्रपतींकडून दया नाहीच, फाशीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 20, 2014 19:02 IST

महाराष्ट्रातील पाच मुलांची अत्यंत निर्घूणपणे हत्या करणा-या दोघी बहिणी, निठारी हत्याकांडातील आरोपी यांच्यासह सहा आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावला आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २०-  महाराष्ट्रातील पाच मुलांची अत्यंत निर्घूणपणे हत्या करणा-या दोघी बहिणी, निठारी हत्याकांडातील आरोपी यांच्यासह सहा आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे या सर्व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तबच झाले आहे. 
फाशीची शिक्षा झालेल्या सहा आरोपींचा दया अर्ज फेटाळावा असे पत्रक केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना पाठवले होते. यानुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी रविवारी सहा जणांचा अर्ज फेटाळला आहे. यात महाराष्ट्रातील रेणूकाबाई आणि सीमा या दोघी बहिणी, राजेंद्र वासनिक, नोएडातील निठारी हत्याकांडमधील सुरेंद्र कोली, मध्यप्रदेशमधील जगदीश, आसाममधील होलीराम बोरदोलोई यांचा समावेश आहे. या आरोपींचा अर्ज फेटाळला गेल्याने त्यांना फाशीची शिक्षा होणार हे स्पष्ट झाले. आता त्यांना कधी फाशीची शिक्षा दिली जाईल याचा निर्णय स्थानिक राज्य सरकारांच्या हाती असेल. 
महाराष्ट्रात १९९० ते १९९६ या कालावधीत रेणुकाबाई, सीमा यांनी त्याच्या आई अंजनाबाई मदतीने १३ मुलांचे अपहरण केले. त्यातील नऊ मुलांची हत्या करण्यात आली होती. कोर्टात पोलिसांना यातील पाच हत्याच सिद्ध करता आल्या. या हत्यांमध्ये त्यांना किरण शिंदे याने मदत केली होती.तो या खटल्यातील माफीचा साक्षीदार होता. कोर्टाने दोघा बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली होती.  तर राजेंद्र वासनिकला २०१२ मध्ये अमरावतीतील आसरा गावातील अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा दिली होती. 
नोएडा येथे २००५ ते २००६ येथे मोनिंदर सिंह पंढेर यांच्या बंगल्याच्या आवारात लहान मुलांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले होते. सुरेंद्र कोली याने मुलांवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाची उकल झाल्याने अनेक मुलांच्या रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांचे गूढ उकलले होते. कोलीवर एकूर्ण १६ खटले सुरु आहेत. 
मध्यप्रदेशमधील जगदीशला त्याची पत्नी व पाच मुलांच्या हत्येप्रकरणी आणि बोरदोलोईला तिघा जीवंत जाळून त्यांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.