शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

काँग्रेसची सूत्रे तरुणांकडे सोपवा

By admin | Updated: May 22, 2016 04:17 IST

काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर

नवी दिल्ली : काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता युवकांच्या हाती सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी मोठ्या सर्जरीबाबत बोललो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु आता आपल्याकडे युवकांच्या हाती सत्ता सोपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. पक्षाच्या दृष्टीनेही हे गरजेचेच आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवक आणि मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेणे आवश्यक झाले आहे. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्या पक्षाने राष्ट्रवादाचा मुखवटा धारण केला आहे. पण त्यांचे खरे धोरण फोडा-तोडा आणि राज्य करा, असे ब्रिटिशांसारखेच आहे. आधुनिक भारताचा पाया राजीव गांधी यांनीच रचला होता. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधीही भाग घेतला नाही, ते आता समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते तरुणांची आणि देशाची दिशाभूल करीत आहेत. आमची लढाई कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, एका विचारधारेशी आहे. संघाची विचारधारा देशात दुही निर्माण करण्याची आहे, असा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)