शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

काँग्रेसची सूत्रे तरुणांकडे सोपवा

By admin | Updated: May 22, 2016 04:17 IST

काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर

नवी दिल्ली : काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता युवकांच्या हाती सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी मोठ्या सर्जरीबाबत बोललो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु आता आपल्याकडे युवकांच्या हाती सत्ता सोपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. पक्षाच्या दृष्टीनेही हे गरजेचेच आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवक आणि मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेणे आवश्यक झाले आहे. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्या पक्षाने राष्ट्रवादाचा मुखवटा धारण केला आहे. पण त्यांचे खरे धोरण फोडा-तोडा आणि राज्य करा, असे ब्रिटिशांसारखेच आहे. आधुनिक भारताचा पाया राजीव गांधी यांनीच रचला होता. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधीही भाग घेतला नाही, ते आता समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते तरुणांची आणि देशाची दिशाभूल करीत आहेत. आमची लढाई कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, एका विचारधारेशी आहे. संघाची विचारधारा देशात दुही निर्माण करण्याची आहे, असा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)