शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

काँग्रेसची सूत्रे तरुणांकडे सोपवा

By admin | Updated: May 22, 2016 04:17 IST

काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर

नवी दिल्ली : काँग्रेस संघटनेमध्ये आता तरुणांच्या हाती सूत्रे द्यावीत, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता युवकांच्या हाती सूत्रे सोपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी मोठ्या सर्जरीबाबत बोललो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु आता आपल्याकडे युवकांच्या हाती सत्ता सोपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. पक्षाच्या दृष्टीनेही हे गरजेचेच आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवक आणि मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेणे आवश्यक झाले आहे. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्या पक्षाने राष्ट्रवादाचा मुखवटा धारण केला आहे. पण त्यांचे खरे धोरण फोडा-तोडा आणि राज्य करा, असे ब्रिटिशांसारखेच आहे. आधुनिक भारताचा पाया राजीव गांधी यांनीच रचला होता. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधीही भाग घेतला नाही, ते आता समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते तरुणांची आणि देशाची दिशाभूल करीत आहेत. आमची लढाई कोणत्या व्यक्तीविरुद्ध नसून, एका विचारधारेशी आहे. संघाची विचारधारा देशात दुही निर्माण करण्याची आहे, असा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)