शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

धार्मिक ध्रुवीकरणावरील मोदींचे मौन चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 02:39 IST

देशभरातील सामान्य जनतेत देशभर भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सत्ताधारी भाजपचे समर्थक आणि सांप्रदायिक शक्ती करीत आहेत

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदेशभरातील सामान्य जनतेत देशभर भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सत्ताधारी भाजपचे समर्थक आणि सांप्रदायिक शक्ती करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे, ही बाब देशाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शरद पवार दिल्लीत शक्यतो पत्रकार घेत नाहीत. राष्ट्रवादीची भूमिका पक्ष प्रवक्तेच सांगतात. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर पवार यांनी अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतुदी, आगामी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कथेरियांच्या आग्य्रातील धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्ये यावर भूमिका मांडली. पंतप्रधानांच्या मौनावर थेट हल्ला चढवून पवारांनी भविष्यातला राजकीय पवित्रा स्पष्ट केला. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने राज्यमंत्री कथेरियांनी धार्मिक विद्वेष पसरवणारे जे भाषण केले, त्याचा निषेध केला असून, कथेरियांच्या मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टीची मागणी केली आहे. जेएनयू व अन्य विद्यापीठांत घडलेल्या चिंताजनक घटना, लातूरमधे अल्पसंख्य पोलीस निरीक्षकावर जमावाने केलेली बळजबरी हे सारे देशात जाणीवपूर्वक धार्मिक धु्रवीकरण घडवून आणण्याचे प्रयोग आहेत, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिकादेशातल्या ५ राज्यांमधे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करतांना पवार म्हणाले, पश्चिम बंगालमधे डावे पक्ष व काँग्रेसला साथ देण्याचे आमचे धोरण असून या समविचारी पक्षांशी समझोता करून आम्ही काही जागा लढवणार आहोत. आसाममधे राष्ट्रवादीचा कोणत्याही पक्षाशी समझोता नसून स्वबळावर आम्ही ८ ते १0 जागा लढवणार आहोत. केरळात आम्ही पूर्वीपासून डाव्या आघाडीत आहोत. त्या भूमिकेत बदल नाही. छगन भुजबळावर कारवाई झाली. देशात अन्य ठिकाणीही मोदी सरकार विरोधकांशी सूडबुध्दीने वागवते, असे आपणास वाटते काय, या प्रश्नावर ते उत्तरले, त्यावर लगेच भाष्य करण्याची मी घाई करणार नाही. जे लोक सरकारशी सहमत आहेत, त्यांचे मात्र बुरे दिन आलेले नाहीत, इतके म्हणता येईल.कृषी क्षेत्राबाबत भ्रामक आकडेवारीकृषी क्षेत्राविषयी काही घोषणा करून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठीच असल्याचा मुलामा चढवला. प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील आकडेवारी भ्रामक व भिन्न आहे असा आरोप पवार यांनी केला. इतिहासात कृषी क्षेत्रासाठी ३५ हजार ९00 कोटींची तरतूद कोणत्याही सरकारने केली नव्हती, असे जेटली सांगत असले तरी मूलत: ही आकडेवारी चुकीची आहे, कारण शेतकऱ्यांसाठी व्याजापोटी माफ करण्यात येणाऱ्या १५ हजार कोटींच्या रकमेचा यापूर्वी बँकिंगविषयक तरतुदीत समावेश असे.ही आकडेवारी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात दाखवण्याची कलाकुसर अर्थमंत्र्यांनी केली. ती वजा केल्यास जेटलींचा दावा खोटा ठरतो, असेही पवार म्हणाले.1 यूपीए १ व २ च्या कारकीर्दीत मनरेगा योजना लागू झाली. पंतप्रधानांनी राज्यसभेत या योजनेची खिल्ली उडवताना यूपीएच्या विफलतेचा तो पुरावा असल्याचे म्हटले होते. 2 अर्थमंत्र्यांनी आता मनरेगाची तरतूद वाढवून यूपीए सरकारचे धोरण योग्यच होते यावर शिक्कामोर्तब केले आहे. 3 यूपीए सरकारने कृषीमालाचे हमी भाव सातत्याने वाढवले. त्यांना तऱ्हेतऱ्हेचे प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भारत तांदूळ निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर, कापूस, साखर आणि गहू निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला, असा दावा करून, एनडीए सरकारने मात्र दोन वर्षांत हमी भाव न वाढवल्याने कृषी उत्पादन घटत चालले आहे, अशी टीका पवारांनी केली.