शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:58 IST

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता केजरीवालांनी तातडीनं कारवाई करत जाहिरात मागे घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे. 

ठळक मुद्देनवी दिल्ली सरकारच्या जाहिरातीमध्ये सिक्कीमला भारताचा शेजारी देश म्हटल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  या जाहिरातीत सिक्कीमला भारताच्या शेजारील असलेल्या भूतान आणि  नेपाळच्या श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. या जाहिरातीवर सिक्कीम सरकारनं लागलीच आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्लीः नवी दिल्ली सरकारच्या जाहिरातीमध्ये सिक्कीमला भारताचा शेजारी देश म्हटल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या जाहिरातीत सिक्कीमला भारताच्या शेजारील असलेल्या भूतान आणि  नेपाळच्या श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. या जाहिरातीवर सिक्कीम सरकारनं लागलीच आक्षेप नोंदवला आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता केजरीवालांनी तातडीनं कारवाई करत जाहिरात मागे घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, सिक्कीम हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा चुका सहन केल्या जाऊ शकत नाहीत. ही जाहिरात मागे घेण्यात आली असून, संबंधित अधिका-यावर कारवाई करण्यात आली आहे. केजरीवालांनी उपराज्यपाल (एलजी) अनिल बैजल यांचे ट्विट पुन्हा रिट्विट करत कारवाईची माहिती दिली आहे. बैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "एका जाहिरातीद्वारे सिक्कीमला शेजारच्या देशांमध्ये स्थान देऊन भारतीय प्रादेशिक अखंडतेचा अवमान केल्याबद्दल नागरी संरक्षण संचालनालय मुख्यालयातील वरिष्ठ अधिका-याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. जाहिरात मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दिल्ली सरकारने जेव्हा नागरी संरक्षण कॉर्पोरेशनची ही जाहिरात प्रसिद्ध केली तेव्हाच मोठा गोंधळ सुरू झाला. त्यात उमेदवारांच्या पात्रता यादीत प्रथम निवास स्थान नमूद करण्यात आले आहे. जाहिरातीत 'भारतीय नागरिक किंवा सिक्कीम, भूतान, नेपाळचे नागरिक आणि दिल्लीचे रहिवासी' असे लिहिले आहे. या जाहिरातीची सिक्कीम सरकारनं गंभीर दखल घेतली असून,  सिक्कीमचे मुख्य सचिव एस.सी. गुप्ता यांनी दिल्ली सरकारला पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदविला. ही 'अपमानजनक' जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी दिल्ली सरकारकडे केली आणि ती जनतेसाठी 'अत्यंत क्लेशकारक' असल्याचे म्हटले. दुसरीकडे सिक्कीमचे सीएम प्रेमसिंग तमांग यांनीही ट्विट करून या जाहिरातीवर कडक आक्षेप नोंदवला. त्यांनी लिहिले, 'सिक्कीम हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. ही (जाहिरात) पूर्णपणे निंदनीय आहे आणि मी चूक सुधारण्यासाठी दिल्ली सरकारला आग्रह करतो. ' पुढील ट्वीटमध्ये ते म्हणाले, 'दिल्ली सरकारची ही जाहिरात विविध प्रिंट माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे, ज्यात सिक्कीमला भूतान आणि नेपाळसारख्या देशांसोबत वेगळे ठेवले गेले आहे. 1975पासून सिक्कीम हा भारताचा एक भाग आहे आणि आठवड्याभरापूर्वीच राज्याचा स्थापना दिवस साजरा केला गेला होता.

हेही वाचा

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालsikkimसिक्किम