शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

By admin | Updated: September 27, 2016 14:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ-यात विदेशी नागरिकांना इलेक्ट्रोनिक यात्रा स्वीकृती (ईटीए) आणि आगमनावर प्रवासी व्हिसा (टीवीओए)ची घोषणा केली होती. याचा फायदा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- 'अतिथी देवो भव' हे भारतीय पर्यटन मंत्रालयाचं ब्रिद वाक्य. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांची वाढती संख्या पाहता हे वाक्य सार्थ ठरताना दिसत आहे. आजचा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्त समोर आलेली आकडेवारी भारतासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.1980 पासून संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक पर्यटन शाखा 27 सप्टेंबरला हा दिन साजरा करीत आली आहे. 1970 साली स्थापन झालेल्या शाखेने जागतिक पर्यटनाचे आराखडे तयार करून, तुर्की येथील इस्तांबूलमध्ये 1997 साली भरलेल्या 12 व्या अधिवेशनात ‘पर्यटन दिवस’ साजरा करण्याचा ठराव केला.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ-यात विदेशी नागरिकांना इलेक्ट्रोनिक यात्रा स्वीकृती (ईटीए) आणि आगमनावर प्रवासी व्हिसा (टीवीओए)ची घोषणा केली होती. याचा फायदा 150 देशातील पर्यटकांना होत असून भारतात येणं त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर झालं आहे.  
 
केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 27 नोव्हेंबर 2014 रोजी केली होती. पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही योजना सुरू झाल्यानंतर भारतात विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. 
 
2015 मध्ये ई-व्हिसावर 1 लाख 10 हजार 657 पर्यटक भारतात आले होते, तर मे 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 4 लाख 34 हजार 927 पर्यटक भारतात आले. तसेच 2014 च्या तुलनेत भारतात येणा-या विदेशी पर्यटकांमध्ये 13.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये जवळपास 32.04 टक्के विदेशी पर्यटक भारतात आले होते. तर 2016 च्या पहिल्या 5 महिन्यात  36.36 लाख विदेशी पर्यटक भारतात आले.
 
यामध्ये हिवाळ्यात भारतात येणा-या पर्यटकांची संख्या जास्त आहे तर उन्हाळ्यामध्ये  मात्र पर्यटकांची संख्या तुलनेने कमी होते.
 भारतात येणा-या विदेशी पर्यटकांची पहिली पसंती ही राजधानी दिल्लीला आहे .त्यानंतर अनुक्रमे आर्थिक राजधानी मुंबईचा आणि चेन्नईचा नंबर लागतो.