शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवसेना-भाजपातच जुंपली!

By admin | Updated: October 7, 2014 05:21 IST

राज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेनेने सभा, सोशल मीडियातून भाजपालाच लक्ष्य करणे सुरु केले आहे़ त्यामुळे पुन्हा मागच्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मराठीचा मुद्दा काढला आणि त्यांच्या सभांनी वातावरण तयार केले होते. शिवसेनेनेदेखील मनसेलाच लक्ष्य केले़ ‘‘आपला शत्रू कोण हे ठरवा, मनसेवर काय बोलायचे ते आम्ही बोलतो, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात बोला’’, असा स्पष्ट फोन भाजपा नेते नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना काही मोजक्या पत्रकारांसमोर केला होता. तरीही तेव्हा टीकेचे लक्ष्य मनसेच राहिली आणि मराठी मतं मोठ्या प्रमाणावर विभागली गेली. ज्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. याचीच आठवण आता भाजपा नेत्यांना होत आहे. युती तोडताना आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले़ पण शिवजयंतीच्या नावाने वर्गण्या गोळा करत कोण फिरतो, अशी बोचरी टीका त्यांनीच केली. त्यावर सेनेने प्रत्युत्तर देत हे भांडण चालू ठेवले आहे. ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीची सोशल मीडियातून शिवसेनेने जेवढी खिल्ली उडवली तेवढी तर काँग्रेसनेदेखील उडवलेली नाही. ज्या व्हॉटस्अ‍ॅपने मोदींना तरुणांमध्ये लोकप्रिय केले़ त्याच व्हॉटस्अ‍ॅपवरदेखील भाजपा सेनेची नळावरच्या भांडणासारखी जुंपली आहे. असाच काहीसा प्रकार काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरु झाला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मांडीला मांडी लावून यापुढे बसणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी करुन टाकली, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणार नाही, त्यांना हवी ती खातीदेखील देणार नाही, असे चव्हाणांनी घोषित केले. पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी कोल्हापुरात तळ ठोकून दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पडद्याआड दिलजमाई घडवली आहे. त्यामुळे आर.आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम ही मंडळी सेफ झाल्याची चर्चा असली तरी मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे या दोघांची भांडणे गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बॅडमिंटन दुहेरीचा सामना चालू आहे आणि त्यात एका बाजूला शिवसेना-भाजपा आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आपापसात लढत आहे. पंच मात्र सामना कधी सुरु होणार याची वाट पहातोय, असे व्यंगचित्र काही दिवसापूर्वी प्रकाशित झाले होते. या परिस्थितीत अजूनही म्हणावा तेवढा फरक पडलेला नाही.