शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहीद दिवस : भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांचे देशासाठी बलिदान

By admin | Updated: March 23, 2017 13:12 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. आज 23 मार्च आणि हा दिवस इतिहासात या शहिदांच्या नावे कोरला गेला आहे. 1931 मध्ये आजच्या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.   
 
86  वर्षांपूर्वी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.शहीद भगत सिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी  झाला. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियवाला बाग हत्याकांडामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि तेव्हापासून स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले गेले.  
 
सायमन कमिशनचा विरोध करणा-या लाला लजपत राय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले होते.  यामुळे त्यांचा मृत्यूही झाला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश रागाने उफाळला होता. याचवेळी चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. लालाची यांच्या मृत्यूच्या बरोबर एक महिन्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आणि 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी सॉडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. 
 
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1930 रोजी कोर्टाने भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर भगत सिंह यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी याचिका करण्यात आली होती. मात्र 10 एप्रिल 1931 रोजी ती रद्द केली गेली.  यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष पं. मदन मोहन मालवीय यांनी 14 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांच्या शिक्षेत माफी देण्यासाठी याचिका केली. याव्यतिरिक्त महात्मा गांधी या प्रकरणात लक्ष घातलं होते. मात्र हे सर्व भगत सिंह यांच्या इच्छेविरोधात केलं जात होते. शिक्षा कमी व्हावी, असे भगत सिंह यांना अजिबात वाटत नव्हते.  
 
यादरम्यान, 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी या तिघांनी गाणं गायलं ....'मेरा रँग दे बसन्ती चोला, मेरा रँग दे; मेरा रँग दे बसन्ती चोला। माय रँग दे बसन्ती चोला।।'