शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शहीद दिवस : भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांचे देशासाठी बलिदान

By admin | Updated: March 23, 2017 13:12 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. आज 23 मार्च आणि हा दिवस इतिहासात या शहिदांच्या नावे कोरला गेला आहे. 1931 मध्ये आजच्या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.   
 
86  वर्षांपूर्वी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.शहीद भगत सिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी  झाला. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियवाला बाग हत्याकांडामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि तेव्हापासून स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले गेले.  
 
सायमन कमिशनचा विरोध करणा-या लाला लजपत राय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले होते.  यामुळे त्यांचा मृत्यूही झाला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश रागाने उफाळला होता. याचवेळी चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. लालाची यांच्या मृत्यूच्या बरोबर एक महिन्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आणि 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी सॉडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. 
 
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1930 रोजी कोर्टाने भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर भगत सिंह यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी याचिका करण्यात आली होती. मात्र 10 एप्रिल 1931 रोजी ती रद्द केली गेली.  यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष पं. मदन मोहन मालवीय यांनी 14 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांच्या शिक्षेत माफी देण्यासाठी याचिका केली. याव्यतिरिक्त महात्मा गांधी या प्रकरणात लक्ष घातलं होते. मात्र हे सर्व भगत सिंह यांच्या इच्छेविरोधात केलं जात होते. शिक्षा कमी व्हावी, असे भगत सिंह यांना अजिबात वाटत नव्हते.  
 
यादरम्यान, 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी या तिघांनी गाणं गायलं ....'मेरा रँग दे बसन्ती चोला, मेरा रँग दे; मेरा रँग दे बसन्ती चोला। माय रँग दे बसन्ती चोला।।'