शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:40 IST

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक
जिल्ह्यातील तीन मोठे मध्यम प्रकल्प वगळता १३ छोटे धरणे आहेत. त्यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी या सहा धरणांमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. तर बहुळा धरणात ०.३०२ इतका उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील १३ धरणांपैकी तब्बल सात धरणांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने या धरणांवर अवलंबून असलेले शहर आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती पुढच्या चार महिन्यात आणखी बिकट होत जाणार आहे.

सुकी, अभोरा व तोंडापूरही जेमतेम
रावेर तालुक्यातील सुकी धरणात ४०.०९५ पाणीसाठा आहे. त्यात २९.७८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात आजच्यास्थितीला ७४.७४ टक्के पाणीसाठा आहे. तर अभोरा धरणात ५.५९२५ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात ४.१७२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सद्यस्थितीला ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. मंगरुळ धरणात ७.९२८ इतका जलसाठा आहे. त्यात ५.५३२ उपयुक्त जलसाठा आहे. तर मोर धरणात ७.६५९ जलसाठा असून ६.११४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. गूळ प्रकल्पात देखील ४५.६१ टक्के जलसाठा आहे.

मार्चपासून बाष्पीभवनाचा वेग अधिक राहणार
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान हे ४५ डिग्रीसेल्सीअसच्या पार जात असते. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व छोट्या प्रकल्पांची ही स्थिती आहे. त्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होणार असल्याने या प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने जलसाठ्यात मोठी घट होण्याचे संकेत आहेत. यासह आवर्तन सोडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होतच राहणार आहे.
१५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने १५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. तीन गावांमध्ये कुपनलिका केल्या असून २३ गावांमध्ये आठ तात्पुरत्या पाणी योजना तर ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या जळगाव, जामनेर, अमळनेर व पारोळा तालुक्यातील २० गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.