शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:40 IST

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक
जिल्ह्यातील तीन मोठे मध्यम प्रकल्प वगळता १३ छोटे धरणे आहेत. त्यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी या सहा धरणांमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. तर बहुळा धरणात ०.३०२ इतका उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील १३ धरणांपैकी तब्बल सात धरणांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने या धरणांवर अवलंबून असलेले शहर आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती पुढच्या चार महिन्यात आणखी बिकट होत जाणार आहे.

सुकी, अभोरा व तोंडापूरही जेमतेम
रावेर तालुक्यातील सुकी धरणात ४०.०९५ पाणीसाठा आहे. त्यात २९.७८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात आजच्यास्थितीला ७४.७४ टक्के पाणीसाठा आहे. तर अभोरा धरणात ५.५९२५ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात ४.१७२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सद्यस्थितीला ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. मंगरुळ धरणात ७.९२८ इतका जलसाठा आहे. त्यात ५.५३२ उपयुक्त जलसाठा आहे. तर मोर धरणात ७.६५९ जलसाठा असून ६.११४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. गूळ प्रकल्पात देखील ४५.६१ टक्के जलसाठा आहे.

मार्चपासून बाष्पीभवनाचा वेग अधिक राहणार
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान हे ४५ डिग्रीसेल्सीअसच्या पार जात असते. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व छोट्या प्रकल्पांची ही स्थिती आहे. त्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होणार असल्याने या प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने जलसाठ्यात मोठी घट होण्याचे संकेत आहेत. यासह आवर्तन सोडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होतच राहणार आहे.
१५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने १५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. तीन गावांमध्ये कुपनलिका केल्या असून २३ गावांमध्ये आठ तात्पुरत्या पाणी योजना तर ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या जळगाव, जामनेर, अमळनेर व पारोळा तालुक्यातील २० गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.