शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:40 IST

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक
जिल्ह्यातील तीन मोठे मध्यम प्रकल्प वगळता १३ छोटे धरणे आहेत. त्यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी या सहा धरणांमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. तर बहुळा धरणात ०.३०२ इतका उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील १३ धरणांपैकी तब्बल सात धरणांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने या धरणांवर अवलंबून असलेले शहर आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती पुढच्या चार महिन्यात आणखी बिकट होत जाणार आहे.

सुकी, अभोरा व तोंडापूरही जेमतेम
रावेर तालुक्यातील सुकी धरणात ४०.०९५ पाणीसाठा आहे. त्यात २९.७८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात आजच्यास्थितीला ७४.७४ टक्के पाणीसाठा आहे. तर अभोरा धरणात ५.५९२५ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात ४.१७२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सद्यस्थितीला ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. मंगरुळ धरणात ७.९२८ इतका जलसाठा आहे. त्यात ५.५३२ उपयुक्त जलसाठा आहे. तर मोर धरणात ७.६५९ जलसाठा असून ६.११४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. गूळ प्रकल्पात देखील ४५.६१ टक्के जलसाठा आहे.

मार्चपासून बाष्पीभवनाचा वेग अधिक राहणार
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान हे ४५ डिग्रीसेल्सीअसच्या पार जात असते. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व छोट्या प्रकल्पांची ही स्थिती आहे. त्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होणार असल्याने या प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने जलसाठ्यात मोठी घट होण्याचे संकेत आहेत. यासह आवर्तन सोडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होतच राहणार आहे.
१५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने १५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. तीन गावांमध्ये कुपनलिका केल्या असून २३ गावांमध्ये आठ तात्पुरत्या पाणी योजना तर ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या जळगाव, जामनेर, अमळनेर व पारोळा तालुक्यातील २० गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.