शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

८५ विमानांचा संपर्क तुटल्यामुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:02 IST

येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

कोलकाता : येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण सुदैवाने त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १0 मिनिटांसाठीच हे घडले असले तरी त्यामुळे ८५ विमानांशी एटीसीचा संपर्क होत नव्हता. तेथून उड्डाण घेतलेली विमाने आणि तिथे येणारी विमाने त्यामुळे संपर्काशिवाय होती. त्यांना एटीसीकडून कोणत्याही सूचना मिळू शकत नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब होती. येणारी आणि जाणारी विमाने यांचे नेमके ठिकाण दाखवणारा एटीसीमधील डिस्प्ले बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यावेळी कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण क्षेत्रात ८५ विमाने आकाशात होती.केंद्र सरकारने आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, याप्रकरणी अहवाल मागवला आहे. विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणाही बंद पडल्याचं लक्षात आले. कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्कबंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली, असे सूत्रांनी सांगितले. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्कसाधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसेच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे, याचे संदेश दिले जातात. (वृत्तसंस्था)