शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

८५ विमानांचा संपर्क तुटल्यामुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:02 IST

येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

कोलकाता : येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण सुदैवाने त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १0 मिनिटांसाठीच हे घडले असले तरी त्यामुळे ८५ विमानांशी एटीसीचा संपर्क होत नव्हता. तेथून उड्डाण घेतलेली विमाने आणि तिथे येणारी विमाने त्यामुळे संपर्काशिवाय होती. त्यांना एटीसीकडून कोणत्याही सूचना मिळू शकत नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब होती. येणारी आणि जाणारी विमाने यांचे नेमके ठिकाण दाखवणारा एटीसीमधील डिस्प्ले बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यावेळी कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण क्षेत्रात ८५ विमाने आकाशात होती.केंद्र सरकारने आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, याप्रकरणी अहवाल मागवला आहे. विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणाही बंद पडल्याचं लक्षात आले. कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्कबंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली, असे सूत्रांनी सांगितले. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्कसाधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसेच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे, याचे संदेश दिले जातात. (वृत्तसंस्था)