शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील स्थळांचे सुरक्षा आॅडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:25 IST

सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांची सर्व संवेदनशील ठिकाणे तसेच पोलीस स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कालबद्ध आॅडिट करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी करण्यात आली.

नवी दिल्ली : सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांची सर्व संवेदनशील ठिकाणे तसेच पोलीस स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कालबद्ध आॅडिट करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी करण्यात आली.पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि सुरक्षेच्या विविध पैलूंवर चर्चा केली. गेल्या २ जानेवारीच्या पठाणकोट हल्ल्यापासून दिल्लीसह अनेक राज्यात हायअलर्ट जारी आहे. सुरक्षा व गुप्तचर संस्थांना अधिक बळकट करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. सीमेपलीकडून असलेला धोका थोपविण्याकरिता गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम आणि अत्याधुनिक बनविणे आवश्यक आहे,असे गृहमंत्रालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.नॉर्थ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीत पठाणकोट हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वंकष चर्चा आणि अशी परिस्थिती हाताळण्यातील सुरक्षा संस्थांच्या भूमिकेवर ऊहापोह करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)