शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

दुस-या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ७९.७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 20:05 IST

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले.

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले. ५६ जागांसाठी एकूण ३८३ उमेदवार रिंगणात असून, यात ३३ महिला आहेत. एकूण १.२ कोटी नागरीकांकडे मतदानाचा अधिकार होता.
 
माओवाद्यांच्या धोक्यामुळे बीरभूम जिल्ह्यातील सात मतदारसंघात मतदानाची वेळ चारवाजेपर्यंत होती. अन्य मतदारसंघात सहावाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवूनही काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. 
 
बीरभूममधील दमरत गावातील मतदान केंद्राजवळ तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. या हिंसाचारात आठ जण जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन-तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर दिनाजपूरमधील सीपीआय (एम), काँग्रेसच्या कार्यालयात घुसून काही जणांनी तोडफोड केली. 
 
या हिंसाचारासाठी काँग्रेसने तृणमुल कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. मालदामध्ये मतदान केंद्राबाहेर सीपीआय(एम) आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.