शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

इशरतप्रकरणी दुसरे प्रतिज्ञापत्र योग्यच

By admin | Updated: March 4, 2016 02:23 IST

इशरत जहां प्रकरणात संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात बदल केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका होत असताना, काँग्रेसचे नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी मात्र

नवी दिल्ली : इशरत जहां प्रकरणात संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात बदल केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका होत असताना, काँग्रेसचे नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी मात्र या बदलाचे गुरुवारी जोरदार समर्थन केले. इंटेलिजन्स ब्युरो आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आधी एक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष चौकशीमध्ये वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले.पहिल्या प्रतिज्ञापत्रात चकमकीमध्ये मारली गेलेली इशरत जहां आणि अन्य तिघेही लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याचे नमूद करण्यात आले होते. ती माहिती गुप्तचर यंत्रणेकडून सरकारकडे आली होती. पण नंतरच्या चौकशीत त्याहून वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मोईली म्हणाले की अनेकदा असे बदल केले जातात. तो काही गुन्हा असू शकत नाही. चुकीची माहिती न्यायालयासमोर गेली असती, तर आणखी अडचणी निर्माण झाल्या असत्या. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी त्या चौघांना गुजरातमध्ये येण्यास भाग पाडले होते, हे लक्षात घेतल्यास ती चकमक बनावट असल्याचेच लक्षात येईल. आरोपींना वा संशयितांना अटक करून नंतर चकमकीच्या नावाखाली ठार मारायचे, हे कायद्यात कोठेच बसत नाही, असे नमूद करून त्या काळात अन्य कोणत्याही राज्यापेक्षा तिथेच सातत्याने चकमकींचे प्रमाण वाढत होते, हे विसरून चालणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)