शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

संजद, रालोद, जेव्हीएम यांचे विलीनीकरण शक्य

By admin | Updated: March 21, 2016 02:42 IST

जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि समाजवादी जनता पार्टी या पक्षांचे बिहार

नवी दिल्ली : जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि समाजवादी जनता पार्टी या पक्षांचे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, संजदचे अध्यक्ष शरद यादव, रालोदचे अध्यक्ष अजितसिंग, त्यांचे पुत्र जयंत चौधरी आणि निवडणूक विषयक डावपेच आखणारे प्रशांत किशोर यांनी गेल्या १५ मार्च रोजी संजदचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक घेतली.या बैठकीत वरील सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नितीशकुमार यांनी जेव्हीएम (पी) चे नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्याशी या मुद्यावर थेट बोलणीही केलेली आहे. मरांडी यांनी भाजपपासून वेगळे झाल्यानंतर जेव्हीएम (पी) स्थापन केला होता. अजितसिंग आणि त्यागी यांनी या विलीनीकरणाबाबत समाजवादी जनता पार्टीचे अध्यक्ष कमल मोरारका यांच्यासोबत अनेकदा चर्चा केलेली आहे. ‘या चारही पक्षांचे लवकरच विलीनीकरण होऊ शकते. याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. विलीनीकरणाची तारीख अद्याप ठरलेली नाही; परंतु नवा पक्ष याच महिन्याअखेरपर्यंत अस्तित्वात येऊ शकतो,’ असे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)