शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संघाचा पुन्हा आरक्षणविरोधी राग, नंतर घुमजाव

By admin | Updated: January 21, 2017 13:37 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून पुन्हा एकदा आरक्षणविरोधी राग आळवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 20 -  उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या गोटातून पुन्हा एकदा आरक्षणविरोधी राग आळवण्यात आला आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी  देशातून आरक्षण  संपुष्टात आणले पाहिजे असे वक्तव्य केले आहे. जयपूर येथे आयोजित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना वैद्य म्हणाले, आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल. मात्र या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊन वातावरण तापव्यावर वैद्य यांनी घुमजाव केले असून, समाजात जोपर्यंत भेदभाव असेल तोपर्यंत आरक्षण कायम राहणार असल्याचे सांगत संघ हा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. 
तत्पूर्वी या कार्यक्रमात बोलताना, आरक्षण जर दीर्घकाळ सुरू राहिले तर ते देशाला फुटीरतावादाकडे घेऊन जाईल अशी भीती मनमोहन वैद्य व्यक्त केली होती,  ते म्हणाले, "कुठल्याही देशात आरक्षणाची व्यवस्था स्थायी राहणे चांगली बाब नाही,  सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळाले पाहिजे, नाहीतर अशी व्यवस्था देशाला फुटीरतावादाकडे घेऊन जाणारी ठरेल." 
वैद्य यांनी यावेळी हिंदुत्वातील विविधतेचाही उल्लेख केला. हिंदुत्व नेहमीच विविधतेची चर्चा करते आणी एका आदर्श हिंदू राष्ट्रात भारताची धार्मिक विविधता स्वीकार्य असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच संविधानातील धर्मनिरपेक्ष या शब्दावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "संविधानात सेक्युलर शब्द समाविष्ट करण्याची मागणी केली होती का, मग हा शब्द संविधानात का समाविष्ट करण्यात आला," असा सवाल त्यांनी केला. 
मात्र वैद्य यांचे हे वक्तव्य निवडणुकांच्या काळात भाजपासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. गतवर्षी बिहार निवडणुकीपूर्वी सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसला होता. दरम्यान, लालूप्रसाद यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी वैद्य यांच्या वक्तव्यावर टीकास्र सोडले आहे.