शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

संघ ‘दक्ष’, राजकारण तप्त !

By admin | Updated: May 12, 2014 02:13 IST

लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्लीतील राजकारणाबाबत कमालीचा ‘दक्ष’ झाल्यानंतर राजकीय पारा चढायला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसची टीका : राजनाथ सिंह संघनेत्यांच्या भेटीस

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्लीतील राजकारणाबाबत कमालीचा ‘दक्ष’ झाल्यानंतर राजकीय पारा चढायला सुरुवात झाली आहे. विशेषत: संघ कार्यालयात फेर्‍या वाढलेल्या भाजपा नेत्यांनी निकालानंतरच्या भूमिकेसंदर्भात शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीच विचारमंथन सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनीही संघाच्या कचेरीत हजेरी लावल्याने त्याला पुष्टी मिळत असतानाच संघ हाच भाजपाचा खरा रिमोट कंट्रोल असल्याची तोफ काँग्रेसने डागली आहे. राजनाथ व संघाच्या पदाधिकार्‍यांच्या ताज्या भेटीदरम्यान निकालासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, तर रविवारी राजनाथ यांनी नवी दिल्लीतील झंडेवाला येथील संघाच्या कार्यालयात सहकार्यवाह भय्याजी जोशी व सुरेश सोनी यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. संघाचे आभार मानण्यासाठी राजनाथ यांनी ही भेट घेतली. मात्र संघाने निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क) मोदींचा रिमोट संघाच्या हातात मोदी यांनी प्रचार संपल्यावर लगेच सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर काँगेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी यांचा रिमोट कंट्रोल संघाच्या हाती असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. ते म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री नेहमी रिमोट कंट्रोलचे उदाहरण देतात. परंतु संघ पदाधिकार्‍यांची त्यांनी घेतलेली भेट सिद्ध करते की, त्यांचा रिमोट संघाच्याच हाती आहे.