शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

धर्मांतरावर संघ ठाम!

By admin | Updated: December 21, 2014 02:39 IST

‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.

‘घर वापसी’ सुरूच ठेवू : भागवत म्हणतात... पसंत नसेल तर कायदा कराकोलकाता : सक्तीने धर्मांतर केले गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.येथील शहीद मिनार मैदानावर भरलेल्या, पश्चिम बंगालमधील अशा प्रकारच्या पहिल्याच, ‘विशाल हिंदू संमेलना’त बोलताना भागवत म्हणाले की, धर्मांतर करून हिंदू करून घेणे कोणाला आवडत नसेल तर हिंदूंचेही धर्मांतर होता कामा नये.भागवत म्हणाले, ‘आम्ही सशक्त हिंदू समाज घडवीत आहोत. जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. प्रलोभने दाखवून व सक्तीने त्यांना नेण्यात आले आहे. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. गेलेले लोक आमचेच आहेत. चोराने चोरलेली आमची मौल्यवान वस्तू, चोराला पकडल्यावर, आम्ही त्याच्याकडून परत घेत आहोत. यात नवीन असे काहीच नाही.उत्तर भारतात काही हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांवरून गेला आठवडाभर संसदेत आणि संसदेबाहेर वादळ उठलेले असताना सरसंघचालकांनी या विषयावर प्रथमच जाहीर वक्तव्य केले. टीकाकारांना उद्देशून ते म्हणाले, ‘हे कोणाला आवडत नसेल तर धर्मांतरावर संपूर्ण बंदी घालणारा कायदा करावा. पण तुम्हाला असा कायदा नको आहे. धर्मांतर करून हिंदू होणे तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही हिंदूंचे धर्मांतरही करू नका. ही आमची ठाम भूमिका आहे. (वृत्तसंस्था)अमित शहांना हवा धर्मांतरबंदी कायदाकोची : धर्मांतराच्या मुद्द्यावर संसदेत विरोधकांनी चालवलेली कोंडी आणि त्यामुळे सरकारची मलीन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर, बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दिली़ देशात धर्मांतरविरोधी कायद्याची गरज अधोरेखित करतानाच, या कायद्यास स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले़ भागवत उवाच...हिंदूंना उद्देशून भागवत यांचे असे म्हणणे होते की, (तुम्ही) घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण आपल्याच देशात राहत आहोत. आपण काही घुसखोर नाही. हा आपला देश आहे, आपले ‘हिंदू राष्ट्र’ आहे. हिंदू आपली (स्वत:ची) भूमी सोडून जाणार नाहीत. भूतकाळात आपण जे गमावले ते आपण परत मिळवू. हिंदूंमधील जागरणाने कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. याविरुद्ध ओरड करणारे स्वार्थी आहेत व अशी ओरड करण्यात त्यांचे निहित हित गुंतलेले आहे.कोणावरही जुलूम-जबरदस्ती करण्यावर हिंदूंचा अजिबात विश्वास नाही, असे प्रतिपादन करून भागवत म्हणाले की, बांगलादेश किंवा पाकिस्तानने अत्याचार केले तरी हिंदू निमूटपणे सहन करतात. १०० पापांचा घडा भरला की मग अत्याचारांचा प्र्रतिकार करा, असे हिंदूंचा परमेश्वर सांगतो.मोदी सरकारच्या विकासाचे ‘धर्मांतर’भाजपाने विकासाच्या नावावर निवडणुका जिंकल्या होत्या़ ‘अच्छे दिन आयेंगे’ असे आश्वासन देशाच्या जनतेला दिले होते़ मात्र निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाप्रणीत रालोआ सरकार गत सहा महिन्यांत ‘लव जिहाद’ आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलत आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली़ जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. - मोहन भागवत