शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

वाळू वाहतूक उठली शिवाजीनगरातील नागरिकांच्या जीवावर

By admin | Updated: January 16, 2017 00:54 IST

जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्‍यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़

जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्‍यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़
शिवाजीनगरातील रस्त्यांवरून रात्री दहा वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्रासपणे वाळू वाहतूक सुरू असते़ दिवसभर काम व रात्री डम्पर, ट्रॅक्टरांच्या आवाजामुळे नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत आहे़ या डम्पर, ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून भरधाव वेगाने वाहन जावून धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे़ लहान मुले रस्त्यावर खेळतात़ त्यामुळे भरधाव जाणार्‍या वाळूच्या वाहनाखाली येवून दुर्घटनेचा धोका आहे़ त्यामुळे मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागते़
आंदोलनानंतर कारवाईचे पोकळ आश्वासने
१) साळुंखे चौकात या वाळू वाहतुकीविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले होते़ यावेळी तत्कालीन डीवाएसपी यांना प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून नागरिकांची समजूत काढावी लागली होती़ वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन मिळाले़ मात्र चार ते पाच दिवस वाहतूक पोलीस दिसला़ यानंतर डीवाएसपींचे आश्वासन हवेत विरले़
२)जिजाऊ चौकात येथील गणेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी चौकात वाहने अडवून धरली होती़ त्यावेळी तहसीलदारांना मध्यस्थी करावी लागली होती़ तहसीलदारांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांनी रस्ता मोकळा केला होता़ यानंतर एक ते दोन ट्रॅक्टर पकडून तहसील विभागाने कारवाईचा कांगावा केला़ यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थैच असल्याचे चित्र आहे़
३)येथील रहिवाश्यांनी तहसीलदार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना निवदेन दिले़ त्यांच्याकडून कारवाई सुरू असून मोहिम राबविण्याबाबतची आश्वासने मिळाली़ मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही़ नुकतेच चार ते पाच दिवसांपूर्वी येथील नगरसेविका गायत्री शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना या वाळू वाहतुकीविरोधात निवेदन दिले़ मात्र अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही