शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वाळू वाहतूक उठली शिवाजीनगरातील नागरिकांच्या जीवावर

By admin | Updated: January 16, 2017 00:54 IST

जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्‍यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़

जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्‍यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़
शिवाजीनगरातील रस्त्यांवरून रात्री दहा वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्रासपणे वाळू वाहतूक सुरू असते़ दिवसभर काम व रात्री डम्पर, ट्रॅक्टरांच्या आवाजामुळे नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत आहे़ या डम्पर, ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून भरधाव वेगाने वाहन जावून धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे़ लहान मुले रस्त्यावर खेळतात़ त्यामुळे भरधाव जाणार्‍या वाळूच्या वाहनाखाली येवून दुर्घटनेचा धोका आहे़ त्यामुळे मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागते़
आंदोलनानंतर कारवाईचे पोकळ आश्वासने
१) साळुंखे चौकात या वाळू वाहतुकीविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले होते़ यावेळी तत्कालीन डीवाएसपी यांना प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून नागरिकांची समजूत काढावी लागली होती़ वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन मिळाले़ मात्र चार ते पाच दिवस वाहतूक पोलीस दिसला़ यानंतर डीवाएसपींचे आश्वासन हवेत विरले़
२)जिजाऊ चौकात येथील गणेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी चौकात वाहने अडवून धरली होती़ त्यावेळी तहसीलदारांना मध्यस्थी करावी लागली होती़ तहसीलदारांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांनी रस्ता मोकळा केला होता़ यानंतर एक ते दोन ट्रॅक्टर पकडून तहसील विभागाने कारवाईचा कांगावा केला़ यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थैच असल्याचे चित्र आहे़
३)येथील रहिवाश्यांनी तहसीलदार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना निवदेन दिले़ त्यांच्याकडून कारवाई सुरू असून मोहिम राबविण्याबाबतची आश्वासने मिळाली़ मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही़ नुकतेच चार ते पाच दिवसांपूर्वी येथील नगरसेविका गायत्री शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना या वाळू वाहतुकीविरोधात निवेदन दिले़ मात्र अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही