शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा विसर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या बलिदान शताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.म.भावे, सु.ह.जोशी व इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.
मोरे पुढे म्हणाले, देशासाठी प्राण दिलेले लोक हे केवळ भूतकाळ नाही तर त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे. इतिहासाचे आपल्याकडे जितके चीज व्हायला हवे तितके होत नाही त्यामुळे स्वत:ला देशप्रेमी मानणार्‍या आणि सत्तेत असणार्‍या सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. क्रांतिकारक पिंगळे हे अतिशय पुरोगामी होते म्हणून इतक्या मोठ्या व्यक्तीला दूर सारणे चुकीचे असून ही चूक आपण लवकरात लवकर सुधारायला हवी.
भावे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी आणि लढाया झाल्या असल्या तरीही स्वातंत्र्यलढ्याला पूरक असेच क्रांतिकारकांचे काम होते. मात्र या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होते. स्वातंत्र्याच्या प्रवाहांचा वेध घेऊन आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा अंदाज घ्यायला हवा. त्यासाठी स्वातंत्र्याचे विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत.
यावेळी सु.ह.जोशी यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या कार्याबाबत देताना आपल्या राज्यात क्रांतीवीरांना स्थान नसल्याबाबत खंत व्यक्त केली. पांडुरंग बलकवडे यांनी प्रास्ताविक केले.