शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रोहितची आत्महत्या वेदनादायी

By admin | Updated: January 23, 2016 04:14 IST

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या

लखनौ/वाराणसी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला. मात्र त्यांनी त्या वादात पडणे टाळले. लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात बोलत असतानाच पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘मोदी गो बॅक’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणाबाजी करीत काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात लगेचच पोलिसांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या गोंधळातही मोदी यांचे भाषण सुरू होते.माझ्या देशातील एक युवा पुत्र रोहित यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, हे वेदनादायी आहे. पुत्र गमावलेल्या एका माऊलीचे दु:ख मी जाणू शकतो. या घटनेमागचे कारण आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण आपल्या जागी आहे, केवळ एका माऊलीने पोटचा गोळा गमावला, हेच वास्तव आहे. मी हे दु:ख समजू शकतो, असे मोदी म्हणाले. अर्थात या प्रकरणी दोन केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध होत असलेल्या आरोपांवर बोलणे त्यांनी टाळले. युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नरत आहे, हे सांगतानाच ‘जॉब सीकर’ नाही तर ‘जॉब क्रिएटर’ बना, असे आवाहन त्यांनी समस्त तरुणाईला केले. तत्पूर्वी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते दिव्यांगांना मदत उपकरणांचे वितरण करण्यात आले. भाजपाप्रणित रालोआ सरकार गरीब, दलित व शोषितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माझ्यावर सर्रास शाब्दिक हल्ले केले जातात. मला वादात गोवण्याचे प्रयत्न होतात. कधीकधी संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले आहे, असे मला वाटते. पण गरीब आणि उपेक्षित व गरजूंसाठी झटणे, त्यांची मदत करणे हा माझा मूलमंत्र आहे. त्यामुळे माझ्यावर तुटून पडणाऱ्यांची मी जराही पर्वा करीत नाही. व्यवस्था बदलते आहेत, त्यामुळे हे होत आहे. मध्यस्थ, दलालांना बाजूला सारले जात आहे. दुकानदाऱ्या बंद केल्या जात आहे. त्याचमुळे काही लोक अस्वस्थ आहेत. पण मी मात्र जराही अस्वस्थ नाही. मी अस्वस्थ आहे तर ते केवळ गरिबांची दुर्दशा आणि त्यांच्या समस्यांमुळे, असे मोदी यावेळी म्हणाले.‘सुगम्य भारत अभियान’सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग लोकांना सुविधा प्रदान करण्यासोबतच त्यांचे आयुष्य अधिक सुविधाजनक बनविण्यास मदत करण्यासाठी मोदींनी ‘सुगम्य भारत अभियान’ चालविण्याची घोषणा केली. गरज भासल्यास यासाठी काही नियम व कायदे बदलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. सरकारी कार्यालयांत दिव्यांग लोकांसाठी विशेष मार्ग आणि शौचालयाच्या सीट असतील, असेही त्यांनी सांगितले.‘दिव्यांग’ घेऊन जाणाऱ्या बसला अपघातवाराणसी: पंतप्रधानांच्या मदत वितरण कार्यक्रमासाठी दिव्यांगांना घेऊन निघालेली एक बस शुक्रवारी सकाळी येथील एका खांबांवर आदळली. यामुळे या अपघातात २२ जण जखमी झाले. बसमध्ये सुमारे ४२ दिव्यांग व्यक्ती होत्या. मोदींनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८ हजार दिव्यांगांना मदत साहित्याचे वाटप केले.