शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

रोहितची आत्महत्या वेदनादायी

By admin | Updated: January 23, 2016 04:14 IST

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या

लखनौ/वाराणसी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला. मात्र त्यांनी त्या वादात पडणे टाळले. लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात बोलत असतानाच पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘मोदी गो बॅक’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणाबाजी करीत काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात लगेचच पोलिसांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या गोंधळातही मोदी यांचे भाषण सुरू होते.माझ्या देशातील एक युवा पुत्र रोहित यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, हे वेदनादायी आहे. पुत्र गमावलेल्या एका माऊलीचे दु:ख मी जाणू शकतो. या घटनेमागचे कारण आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण आपल्या जागी आहे, केवळ एका माऊलीने पोटचा गोळा गमावला, हेच वास्तव आहे. मी हे दु:ख समजू शकतो, असे मोदी म्हणाले. अर्थात या प्रकरणी दोन केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध होत असलेल्या आरोपांवर बोलणे त्यांनी टाळले. युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नरत आहे, हे सांगतानाच ‘जॉब सीकर’ नाही तर ‘जॉब क्रिएटर’ बना, असे आवाहन त्यांनी समस्त तरुणाईला केले. तत्पूर्वी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते दिव्यांगांना मदत उपकरणांचे वितरण करण्यात आले. भाजपाप्रणित रालोआ सरकार गरीब, दलित व शोषितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माझ्यावर सर्रास शाब्दिक हल्ले केले जातात. मला वादात गोवण्याचे प्रयत्न होतात. कधीकधी संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले आहे, असे मला वाटते. पण गरीब आणि उपेक्षित व गरजूंसाठी झटणे, त्यांची मदत करणे हा माझा मूलमंत्र आहे. त्यामुळे माझ्यावर तुटून पडणाऱ्यांची मी जराही पर्वा करीत नाही. व्यवस्था बदलते आहेत, त्यामुळे हे होत आहे. मध्यस्थ, दलालांना बाजूला सारले जात आहे. दुकानदाऱ्या बंद केल्या जात आहे. त्याचमुळे काही लोक अस्वस्थ आहेत. पण मी मात्र जराही अस्वस्थ नाही. मी अस्वस्थ आहे तर ते केवळ गरिबांची दुर्दशा आणि त्यांच्या समस्यांमुळे, असे मोदी यावेळी म्हणाले.‘सुगम्य भारत अभियान’सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग लोकांना सुविधा प्रदान करण्यासोबतच त्यांचे आयुष्य अधिक सुविधाजनक बनविण्यास मदत करण्यासाठी मोदींनी ‘सुगम्य भारत अभियान’ चालविण्याची घोषणा केली. गरज भासल्यास यासाठी काही नियम व कायदे बदलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. सरकारी कार्यालयांत दिव्यांग लोकांसाठी विशेष मार्ग आणि शौचालयाच्या सीट असतील, असेही त्यांनी सांगितले.‘दिव्यांग’ घेऊन जाणाऱ्या बसला अपघातवाराणसी: पंतप्रधानांच्या मदत वितरण कार्यक्रमासाठी दिव्यांगांना घेऊन निघालेली एक बस शुक्रवारी सकाळी येथील एका खांबांवर आदळली. यामुळे या अपघातात २२ जण जखमी झाले. बसमध्ये सुमारे ४२ दिव्यांग व्यक्ती होत्या. मोदींनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८ हजार दिव्यांगांना मदत साहित्याचे वाटप केले.