शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रोहित, कन्हैयाला न्याय द्या!

By admin | Updated: February 24, 2016 02:53 IST

संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना,

नवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना, व ‘आप’च्या विद्यार्थी संघटनेने दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवरून जंतर मंतरपर्यंत एका संयुक्त मोर्चाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाला मृत्यूनंतरही न्याय मिळालेला नाही. ज्या केंद्रीय मंत्र्यांवर याबाबत आरोप झाले, त्यांची साधी चौकशीही आजपर्यंत झाली नाही. हैदराबाद आणि जेएनयू परिसरात जे घडले त्याला भाजपची अभाविप ही संघटनाच जबाबदार आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.रोहितच्या कुटुंबीयांची ओळख करून देत प्रकाश आंबेडकरांनीही मोर्चाला उद्देशून भाषण केले. रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यावेळी म्हणाले, ‘रोहितला न्याय मिळावा, यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्याच्या आत्महत्याप्रकरणात स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय व विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. (विशेष प्रतिनिधी)जंतर-मंतर राहुल गांधी, केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांची उपस्थितीआंबेडकर भवनापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांबरोबर रोहितचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मोदी सरकार, भाजप व रा.स्व. संघाच्या विरोधात आक्रमक घोषणा देत हा मोर्चा जंतर मंतर वर पोहोचला, तेव्हा राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांसह काही डावे नेतेही तिथे झाले. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला खूपच महत्त्व मिळाले. भाजपकडून सत्तेचा दुरूपयोग भाजपने सत्तेचा उघड दुरूपयोग चालवला असल्याचा आरोप करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, संघाची कालबाह्य विचारसरणी लादण्यासाठी अभाविपसारख्या संघटनांच्या चिथावणीवरून देशभर महाविद्यालये व विद्यापीठांच्या प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. विविध पक्षाच्या खासदारांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राजीव सातव, बिहारचे पप्पू यादव आदींचा समावेश होता.विद्यार्थ्यांवर दहशत बसवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पोलीस तैनात केले जात आहेत. अभ्यासाच्या वातावरणावर तणावाची छाया निर्माण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज यापुढे दडपू शकणार नाही, असा कायदा करणे गरजेचे आहे.