शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अधिकारांचे विभाजन न्यायपालिकांतही हवे

By admin | Updated: March 23, 2017 00:52 IST

लोकशाहीच्या अन्य स्तंभांप्रमाणे न्यायपालिकांनाही अधिकारांचे विभाजन लागू आहे, असे मत केंद्र सरकारच्या वतीने कायदामंत्री

नवी दिल्ली : लोकशाहीच्या अन्य स्तंभांप्रमाणे न्यायपालिकांनाही अधिकारांचे विभाजन लागू आहे, असे मत केंद्र सरकारच्या वतीने कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत व्यक्त केले. काही सदस्यांनी असा दावा केला की, सर्वोच्च न्यायालय आपल्या काही निर्णयाच्या माध्यमातून संसदेच्या कायदा बनविण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे. त्यावर रविशंकर प्रसाद यांनी हे मत व्यक्त केले. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी सांगितले की, जर देश राष्ट्रपती, तिन्ही दलाचे प्रमुख आदींमध्ये पंतप्रधानांची भूमिका स्वीकारतात. तर, कायदा मंत्र्यांच्या माध्यमातून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत आमच्यावर विश्वास का नाही ठेवला जात? ते म्हणाले की, न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रकरणात कॉलेजियम पद्धत समाप्त करण्यासाठी संसदेने एनजेएसी कायदा मंजूर केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. यावर न्यायालयाने स्पष्टीकरण दिले होते की, एखाद्या पक्षकाराला असे वाटू शकते की, न्यायाधीशांची नियुक्ती अशा समितीने केली आहे ज्याचे कायदामंत्री सदस्य आहेत. त्यामुळे अशी समिती निष्पक्षपणे काम करू शकत नाही. या मुद्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर होते. भाजपचे संजय जैस्वाल म्हणाले की, क्रिकेट व्यवस्थापन ते मेडिकल प्रवेश परीक्षांबाबत आपले निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालय कायदा बनविण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करत आहे. यावर प्रसाद यांनी अधिक भाष्य केले नाही. पण, केरळातील एका खटल्याचा हवाला देऊन ते म्हणाले की, न्यायालयाने केशवानंद विरुद्ध करळ सरकार या प्रकरणात लोकशाहीच्या तीन अंगांमध्ये अधिकाराचे विभाजन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)