शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

अधिकारांचे विभाजन न्यायपालिकांतही हवे

By admin | Updated: March 23, 2017 00:52 IST

लोकशाहीच्या अन्य स्तंभांप्रमाणे न्यायपालिकांनाही अधिकारांचे विभाजन लागू आहे, असे मत केंद्र सरकारच्या वतीने कायदामंत्री

नवी दिल्ली : लोकशाहीच्या अन्य स्तंभांप्रमाणे न्यायपालिकांनाही अधिकारांचे विभाजन लागू आहे, असे मत केंद्र सरकारच्या वतीने कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत व्यक्त केले. काही सदस्यांनी असा दावा केला की, सर्वोच्च न्यायालय आपल्या काही निर्णयाच्या माध्यमातून संसदेच्या कायदा बनविण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे. त्यावर रविशंकर प्रसाद यांनी हे मत व्यक्त केले. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी सांगितले की, जर देश राष्ट्रपती, तिन्ही दलाचे प्रमुख आदींमध्ये पंतप्रधानांची भूमिका स्वीकारतात. तर, कायदा मंत्र्यांच्या माध्यमातून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत आमच्यावर विश्वास का नाही ठेवला जात? ते म्हणाले की, न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रकरणात कॉलेजियम पद्धत समाप्त करण्यासाठी संसदेने एनजेएसी कायदा मंजूर केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. यावर न्यायालयाने स्पष्टीकरण दिले होते की, एखाद्या पक्षकाराला असे वाटू शकते की, न्यायाधीशांची नियुक्ती अशा समितीने केली आहे ज्याचे कायदामंत्री सदस्य आहेत. त्यामुळे अशी समिती निष्पक्षपणे काम करू शकत नाही. या मुद्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर होते. भाजपचे संजय जैस्वाल म्हणाले की, क्रिकेट व्यवस्थापन ते मेडिकल प्रवेश परीक्षांबाबत आपले निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालय कायदा बनविण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करत आहे. यावर प्रसाद यांनी अधिक भाष्य केले नाही. पण, केरळातील एका खटल्याचा हवाला देऊन ते म्हणाले की, न्यायालयाने केशवानंद विरुद्ध करळ सरकार या प्रकरणात लोकशाहीच्या तीन अंगांमध्ये अधिकाराचे विभाजन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)