शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘ट्रिपल तलाक’चा निकाल राखीव

By admin | Updated: May 19, 2017 01:55 IST

उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ट्रिपल तलाकवर सुनावणी केली. यात केंद्र सरकार, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, आॅल इंडिया मुस्लिम वूमेन पर्सनल लॉ बोर्ड यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने मुस्लिम संघटनांना विचारले की, ट्रिपल तलाक हा श्रद्धेचा विषय असू शकतो का? जर ते म्हणत असतील की, हा पितृसत्ताक, धर्मशास्त्रानुसार चुकीचा आहे. या घटनापीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. यू. यू. ललित व न्या. अब्दुल नजीर यांचा सहभाग होता. ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. यातील सदस्य हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी समुदायाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ते याची चौकशी करणार आहेत की, मुस्लिमांमधील प्रचलित प्रथा धर्माशी संबंधित मौलिक अधिकार आहे का? तसेच सध्या बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर विचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर नंतर विचार करण्यात येणार आहे. न्यायालयाने चिकित्सा करू नये -खुर्शिदन्यायालयाने म्हटले आहे की, खुर्शिद म्हणतात, हे पाप आहे. पापी प्रथा श्रद्धेचा विषय असू शकतो का? ट्रिपल तलाक १४०० वर्षांपासून चालू आहे. याचे उत्तर आहे, होय. तो पूर्ण जगात सुरू आहे का?. याचे उत्तर आहे, नाही. व्यवस्था स्वत:च सांगत आहे की, हा प्रकार चुकीचा आहे. खुर्शिद यांचे असे म्हणणे होते की, न्यायालयाने याची चिकित्सा करू नये.