शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

‘ट्रिपल तलाक’चा निकाल राखीव

By admin | Updated: May 19, 2017 01:55 IST

उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ट्रिपल तलाकवर सुनावणी केली. यात केंद्र सरकार, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, आॅल इंडिया मुस्लिम वूमेन पर्सनल लॉ बोर्ड यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने मुस्लिम संघटनांना विचारले की, ट्रिपल तलाक हा श्रद्धेचा विषय असू शकतो का? जर ते म्हणत असतील की, हा पितृसत्ताक, धर्मशास्त्रानुसार चुकीचा आहे. या घटनापीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. यू. यू. ललित व न्या. अब्दुल नजीर यांचा सहभाग होता. ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. यातील सदस्य हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी समुदायाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ते याची चौकशी करणार आहेत की, मुस्लिमांमधील प्रचलित प्रथा धर्माशी संबंधित मौलिक अधिकार आहे का? तसेच सध्या बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर विचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर नंतर विचार करण्यात येणार आहे. न्यायालयाने चिकित्सा करू नये -खुर्शिदन्यायालयाने म्हटले आहे की, खुर्शिद म्हणतात, हे पाप आहे. पापी प्रथा श्रद्धेचा विषय असू शकतो का? ट्रिपल तलाक १४०० वर्षांपासून चालू आहे. याचे उत्तर आहे, होय. तो पूर्ण जगात सुरू आहे का?. याचे उत्तर आहे, नाही. व्यवस्था स्वत:च सांगत आहे की, हा प्रकार चुकीचा आहे. खुर्शिद यांचे असे म्हणणे होते की, न्यायालयाने याची चिकित्सा करू नये.