शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

By admin | Updated: November 13, 2015 00:53 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे

पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे, असे पक्षाचे खासदारद्वय शत्रुघ्न सिन्हा आणि भोला सिंह यांनी केली आहे.‘बेजबाबदार’ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुधवारी भाजपा नेतृत्वाने दिला होता. परंतु त्याचा कसलाही परिणाम या दोन नेत्यांवर झालेला दिसत नाही. ‘आम्ही जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता कामा नये,’ असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, तर ‘मूलभूत अपयशाबाबत आत्मचिंतन करण्यात आले पाहिजे,’ असे मत खा. भोला सिंह यांनी व्यक्त केले.शत्रुघ्न सिन्हा यांनी, बिहार निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या निवेदनाचे स्वागत केले आहे.‘निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या मानहानीकारक पराभवामुळे आम्ही अतिशय दु:खी झालो आहोत. आम्हाला या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता येणार नाही,’ असे चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘आम्ही मित्र, तत्त्वज्ञ, गुरू, मार्गदर्शक आणि त्यांच्या चार जणांच्या चमूचे अनुसरण करण्याची हीच योग्य वेळ आणि काळाची गरज आहे. खरे पाहता रिले दौड प्रारंभ झाली आहे. गँग आॅफ फोरने लक्ष्यावर जोरदार वार केला आहे,’ असे चित्रपटातून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार या चार वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले असतानाच सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे. मागील एका वर्षात पक्ष प्रभावहीन बनविण्यात आला आहे आणि काही मूठभर लोकांच्या हाती जाण्यास बाध्य करण्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या चारही नेत्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. पराभवाच्या कारणांची समीक्षा करण्याची मागणीही या निवेदनात केली होती. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले असते तर बिहार निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले असते, असे विधान आपण केल्याचा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टपणे इन्कार केला. आपल्याला निवडणूक प्रचार करू दिला असता तर परिस्थिती वेगळीच असती, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)मोदींची जादू टिकावू नाही दरम्यान बेगुसरायचे भाजपा खासदार भोला सिंह म्हणाले, ‘मोदींची जादू टिकावू नाही हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. बिहार निवडणूक प्रचारातील मोदींचे भाषण अशोभनीय होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीतून लोकांच्या मनावर ‘मोदी जादू’चा परिणाम होण्यास मदत झाली. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्याने ती जादू कुठेच दिसत नाही.’भोला सिंह यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ‘सत्तेच्या नशेत गुंग असलेले पक्ष नेतृत्व नेहमीच खुशामत करणाऱ्यांनी वेढलेले दिसत होते,’ असे ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हांच्या मताशी सहमती दर्शविताना ते म्हणाले, ‘ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को. प्रत्येकाचा विश्वास असणारे नेतृत्व असावे. सध्या अशा नेतृत्वाचा अभाव आहे. या पराभवासाठी शहाच जबाबदार आहेत. आपल्यामुळे विजय झाल्याचा तुम्ही दावा करता आणि त्या आधारावर पक्षाध्यक्ष बनता. मग पराभवासाठी अडवाणींना दोष द्यायचा काय?’भोला सिंह यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे, हे येथे उल्लेखनीय.