शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

By admin | Updated: November 13, 2015 00:53 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे

पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे, असे पक्षाचे खासदारद्वय शत्रुघ्न सिन्हा आणि भोला सिंह यांनी केली आहे.‘बेजबाबदार’ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुधवारी भाजपा नेतृत्वाने दिला होता. परंतु त्याचा कसलाही परिणाम या दोन नेत्यांवर झालेला दिसत नाही. ‘आम्ही जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता कामा नये,’ असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, तर ‘मूलभूत अपयशाबाबत आत्मचिंतन करण्यात आले पाहिजे,’ असे मत खा. भोला सिंह यांनी व्यक्त केले.शत्रुघ्न सिन्हा यांनी, बिहार निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या निवेदनाचे स्वागत केले आहे.‘निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या मानहानीकारक पराभवामुळे आम्ही अतिशय दु:खी झालो आहोत. आम्हाला या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता येणार नाही,’ असे चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘आम्ही मित्र, तत्त्वज्ञ, गुरू, मार्गदर्शक आणि त्यांच्या चार जणांच्या चमूचे अनुसरण करण्याची हीच योग्य वेळ आणि काळाची गरज आहे. खरे पाहता रिले दौड प्रारंभ झाली आहे. गँग आॅफ फोरने लक्ष्यावर जोरदार वार केला आहे,’ असे चित्रपटातून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार या चार वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले असतानाच सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे. मागील एका वर्षात पक्ष प्रभावहीन बनविण्यात आला आहे आणि काही मूठभर लोकांच्या हाती जाण्यास बाध्य करण्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या चारही नेत्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. पराभवाच्या कारणांची समीक्षा करण्याची मागणीही या निवेदनात केली होती. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले असते तर बिहार निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले असते, असे विधान आपण केल्याचा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टपणे इन्कार केला. आपल्याला निवडणूक प्रचार करू दिला असता तर परिस्थिती वेगळीच असती, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)मोदींची जादू टिकावू नाही दरम्यान बेगुसरायचे भाजपा खासदार भोला सिंह म्हणाले, ‘मोदींची जादू टिकावू नाही हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. बिहार निवडणूक प्रचारातील मोदींचे भाषण अशोभनीय होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीतून लोकांच्या मनावर ‘मोदी जादू’चा परिणाम होण्यास मदत झाली. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्याने ती जादू कुठेच दिसत नाही.’भोला सिंह यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ‘सत्तेच्या नशेत गुंग असलेले पक्ष नेतृत्व नेहमीच खुशामत करणाऱ्यांनी वेढलेले दिसत होते,’ असे ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हांच्या मताशी सहमती दर्शविताना ते म्हणाले, ‘ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को. प्रत्येकाचा विश्वास असणारे नेतृत्व असावे. सध्या अशा नेतृत्वाचा अभाव आहे. या पराभवासाठी शहाच जबाबदार आहेत. आपल्यामुळे विजय झाल्याचा तुम्ही दावा करता आणि त्या आधारावर पक्षाध्यक्ष बनता. मग पराभवासाठी अडवाणींना दोष द्यायचा काय?’भोला सिंह यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे, हे येथे उल्लेखनीय.