शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पराभवाची जबाबदारी निश्चित व्हावी!

By admin | Updated: November 13, 2015 00:53 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे

पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे, असे पक्षाचे खासदारद्वय शत्रुघ्न सिन्हा आणि भोला सिंह यांनी केली आहे.‘बेजबाबदार’ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुधवारी भाजपा नेतृत्वाने दिला होता. परंतु त्याचा कसलाही परिणाम या दोन नेत्यांवर झालेला दिसत नाही. ‘आम्ही जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता कामा नये,’ असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, तर ‘मूलभूत अपयशाबाबत आत्मचिंतन करण्यात आले पाहिजे,’ असे मत खा. भोला सिंह यांनी व्यक्त केले.शत्रुघ्न सिन्हा यांनी, बिहार निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या निवेदनाचे स्वागत केले आहे.‘निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या मानहानीकारक पराभवामुळे आम्ही अतिशय दु:खी झालो आहोत. आम्हाला या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यापासून पळ काढता येणार नाही,’ असे चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘आम्ही मित्र, तत्त्वज्ञ, गुरू, मार्गदर्शक आणि त्यांच्या चार जणांच्या चमूचे अनुसरण करण्याची हीच योग्य वेळ आणि काळाची गरज आहे. खरे पाहता रिले दौड प्रारंभ झाली आहे. गँग आॅफ फोरने लक्ष्यावर जोरदार वार केला आहे,’ असे चित्रपटातून राजकारणात आलेले सिन्हा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार या चार वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले असतानाच सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे. मागील एका वर्षात पक्ष प्रभावहीन बनविण्यात आला आहे आणि काही मूठभर लोकांच्या हाती जाण्यास बाध्य करण्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या चारही नेत्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. पराभवाच्या कारणांची समीक्षा करण्याची मागणीही या निवेदनात केली होती. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले असते तर बिहार निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले असते, असे विधान आपण केल्याचा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टपणे इन्कार केला. आपल्याला निवडणूक प्रचार करू दिला असता तर परिस्थिती वेगळीच असती, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)मोदींची जादू टिकावू नाही दरम्यान बेगुसरायचे भाजपा खासदार भोला सिंह म्हणाले, ‘मोदींची जादू टिकावू नाही हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. बिहार निवडणूक प्रचारातील मोदींचे भाषण अशोभनीय होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीतून लोकांच्या मनावर ‘मोदी जादू’चा परिणाम होण्यास मदत झाली. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्याने ती जादू कुठेच दिसत नाही.’भोला सिंह यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ‘सत्तेच्या नशेत गुंग असलेले पक्ष नेतृत्व नेहमीच खुशामत करणाऱ्यांनी वेढलेले दिसत होते,’ असे ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हांच्या मताशी सहमती दर्शविताना ते म्हणाले, ‘ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को. प्रत्येकाचा विश्वास असणारे नेतृत्व असावे. सध्या अशा नेतृत्वाचा अभाव आहे. या पराभवासाठी शहाच जबाबदार आहेत. आपल्यामुळे विजय झाल्याचा तुम्ही दावा करता आणि त्या आधारावर पक्षाध्यक्ष बनता. मग पराभवासाठी अडवाणींना दोष द्यायचा काय?’भोला सिंह यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे, हे येथे उल्लेखनीय.