राष्ट्रपतींचे अभिभाषण : महागाई, भ्रष्टाचार रोखण्याचा मोदी सरकारचा अजेंडा
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
‘किमान सरकार आणि कमाल कामकाज’ हेच नव्या सरकारचे ध्येय असून सांप्रदायिक हिंसाचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यासोबतच, सर्वासोबत सर्वाचा विकास, भ्रष्टाचाराला आळा, महागाईवर नियंत्रण, गुंतवणुकीला चालना, नव्या रोजगारांची निर्मिती, 2क्22र्पयत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर आणि 24 तास वीज, महिलांना 33 टक्के आरक्षण आणि काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन याला नवनियुक्त सरकारचे प्राधान्य राहील, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी आपल्या अभिभाषणात सांगितल़े
लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपतींनी संबोधित केल़े आपल्या 5क् मिनिटांच्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारचा अजेंडा सादर केला़ सद्य:स्थितीत देशाला सक्षम आणि स्थिर सरकारची गरज होती़ मतदारांनी देशातील स्थैर्य, स्वच्छ प्रशासन आणि विकासासाठी मतदान केल़े मतदारांनी दाखविलेला विवेक प्रशंसनीय आहे, असे सांगत राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली़
भारतातील जनतेने संघटित, सक्षम आणि आधुनिक भारतासाठी, एक भारत, श्रेष्ठ भारत यासाठी मतदान केले आह़े नवे सरकार या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या महान देशाच्या 125 कोटी जनतेसोबत मिळून काम करेल़ भारताच्या विकासात हे सरकार अल्पसंख्याकांना समान भागीदारी देईल़ करप्रणालीतील त्रुटी दूर सारून त्यात स्थैर्य आणि पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करेल़ सांप्रदायिक हिंसाचारासोबतच नक्षलवाद आणि दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका घेईल़ स्वच्छ, पारदर्शी आणि निष्पक्ष प्रशासन देणारे धोरण सरकार आणोल, असा विश्वास राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात व्यक्त केला़
काळा पैसा परत आणण्याचे प्रयत्न :
भारतीयांचा विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी विविध देशांशी संपर्क साधणार.
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन :
काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी सरकारची कटिबद्धता. आपल्या कार्यकाळात सरकार त्यावर विशेषत्वाने काम करेल़
प्रत्येक घरात 24 तास वीज :
2क्22 र्पयत प्रत्येक घरात 24 तास वीज देण्यासाठी सरकार लवकरच राष्ट्रीय ऊर्जा धोरण आणोल़ याअंतर्गत परंपरागत व अपारंपरिक ऊर्जास्नेतांद्वारे
संतुलित वीज उत्पादनावर भर
असेल़
अभ्यासक्रमात क्रीडा विषय अनिवार्य :
शालेय अभ्यासक्रमात क्रीडा विषय अनिवार्य बनवून सरकार राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध कार्यक्रम सुरू करेल़
लोकपालावर भर :
भ्रष्टाचाराशी निपटण्यासाठी लोकपाल महत्त्वाचे आह़े नवे सरकार स्वच्छ व पारदर्शक सरकार देण्यासाठी कटिबद्ध आह़े हे सरकार लोकपालासाठी कायद्यानुरूप नियम बनविण्यासाठी प्रयत्नरत आह़े
मान्सूनच्या स्थितीवर नजर :
यंदा सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज बघता, सरकार सतर्क आहे आणि आपत्कालीन योजना तयार करीत आहे.
अभिभाषणातील ‘मोदी अजेंडा’
च्सन 2क्22 र्पयत देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळेल़ या ठिकाणी पाणी, शौचालय आणि 24 तास वीज उपलब्ध असेल़ 2क्19 मध्ये महात्मा गांधींच्या 15क् व्या जयंतीप्रीत्यर्थ श्रद्धांजली म्हणून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जाईल़ वाढते शहरीकरण एक आव्हान म्हणून घेत, नवे सरकार जागतिक सोयीसुविधांनी संपन्न अशी 1क्क् नवी शहरे वसवणार.
सांप्रदायिक दंगलींबाबत ‘झीरो टॉलरन्स’
च्सांप्रदायिक दंगली, सांप्रदायिक हिंसाचाराबाबत सरकार ‘झीरो टॉलरन्स’(कदापि खपवून न घेणो) धोरण असेल़ यासाठी राज्यांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय योजना आणली जाईल़
ठळक मुद्दे
च्भ्रष्टाचार रोखण्यास प्राधान्य
च्महिलांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही
च्काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी कटिबद्ध
च्अमेरिकेसोबत संबंध दृढ करणार
च्सर्व राज्यांत एम्ससारखे रुग्णालय
च्संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण
च्2क्22 र्पयत सर्वाना पक्के घर आणि 24 तास वीज
च्तेलंगण व आंध्र प्रदेशच्या गरजा पूर्ण केल्या जातील
च्नवी आरोग्य योजना आणि नवे विमा धोरण
च्कृषी उत्पादनांचे मूल्य आणि साठवणूक यावर भर
च्प्रत्येक घरात शौचालय धोरण
च्ईशान्य भागात रेल्वे विकासावर भर, घुसखोरी समस्येशी निपटणार
च्देशभरातील मदरशांचे आधुनिकीकरण
च्दहशतवाद आणि माओवादाला अजिबात थारा नाही
च्पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय अभियान
च्सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाच्या बळावर ‘ब्रँड इंडिया’