शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आरक्षण धोरण कायम राहणार; सरकारची ग्वाही

By admin | Updated: March 15, 2016 04:18 IST

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये श्रीमंतांना आरक्षण देण्यात येऊ नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणत असला, तरी सामाजिक आणि जातीवर आधारित असलेल्या विद्यमान

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये श्रीमंतांना आरक्षण देण्यात येऊ नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणत असला, तरी सामाजिक आणि जातीवर आधारित असलेल्या विद्यमान आरक्षण धोरणाचा फेरविचार केला जाणार नाही आणि हे आरक्षण यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली.‘आरक्षणाची विद्यमान व्यवस्था कायम राहील हेच सरकारचे धोरण आहे,’ असे राज्यसभेचे नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेत्यांच्या रविवारच्या वक्तव्याबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या समाजवादी पार्टी आणि बसपा सदस्यांना उत्तर देताना स्पष्ट केले. ‘आरक्षण बंद करण्याबाबत किंवा सध्याच्या आरक्षण धोरणात बदल करण्याबाबत आरएसएस कधी बोललेला नाही,’ असेही जेटली यांनी या वेळी सांगितले. तत्पूर्वी, सपाचे रामगोपाल यादव यांनी आरक्षण काढून घेण्याचे कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप केला. बसपा नेत्या मायावती म्हणाल्या, ‘‘अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी लावलेल्या निकषांची स्पष्ट अशी व्याख्या भारतीय राज्यघटनेने केलेली आहे; परंतु आरएसएसचे पदाधिकारी मात्र आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत.’’ (वृत्तसंस्था)