शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नापासांची जुलैमध्ये फेरपरीक्षा!

By admin | Updated: June 12, 2015 05:38 IST

मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार

मुंबई : मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असून, २० आॅगस्टदरम्यान निकाल जाहीर करण्यात येईल. १ सप्टेंबरपासून त्यांचा पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तावडे म्हणाले की, नापास विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालविण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे त्यांना अजून एक संधी लगेचच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; त्यांना या परीक्षेस बसून आपले वर्ष वाचविण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे.  येत्या १५ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील. १५ जुलै दरम्यान प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होऊन आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल घोषित होईल. यामुळे आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा बंद होईल, असे तावडे यांनी सांगितले. ५० टक्के निकाल लागलेल्या शाळांची बैठकराज्यातील सुमारे ३५० शाळांचे निकाल ५० टक्क्यांहून कमी लागले आहेत. अशा शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांची बैठक बोलविणार असून संबंधित शाळांना कोणत्या अडचणी आहेत, या शाळांचा निकाल कमी का लागला? याबाबत सविस्तर चर्चा जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येईल, असे तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)