शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

चीनची पुन्हा घुसखोरी, अरुणाचलमध्ये केला प्रवेश

By admin | Updated: June 14, 2016 07:22 IST

चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, पिपल्स लिबरेशन आर्मीच्या 250 जवानांनी गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशमधील कामेंग येथे वेश केला होता.

ऑनलाइन लोकमत - 
इटानगर, दि. 14 - चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशमधील कामेंग येथे चीन लष्कराने प्रवेश केला होता. पिपल्स लिबरेशन आर्मीचे 250 जवान या घुसखोरीत सामील होते अशी माहिती भारतीय लष्कराच्या सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र अरुणाचलमध्ये प्रवेश केल्याच्या काही तासातच जवान माघारी फिरले.
 
(26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य)
 
चीनने याअगोदरही भारतामध्ये अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे पुरावेही वारंवार भारताने सादर केले आहेत. मात्र चीनने अद्यापही घुसखोरी रोखलेली नाही आहे. 9 जूनला कामेंगच्या पुर्वेकडे चीनच्या गस्त विभागाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. विेशेष म्हणजे भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यावरुन चीन विरोध करत असताना अगोदरच दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचवेळी चीनकडून ही घुसखोरी झाली आहे. 
 
 
चीनने यावर्षी घुसखोरी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चीनने हा आमचा भाग असल्याचा दावा वारंवार केला आहे. चीन लष्कराच्या जवानांनी परत फिरण्याअगोदर सीमारेषेवर तीन तास घालवले असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे.