शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

भटकंतीचे जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 5, 2015 03:19 IST

गुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५0 वषार्पासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत

फारुख शेख, पाटणगुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५0 वषार्पासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यापर्यंत शासनाची कोणतीच योजना पोहचलेली नाही.प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्या डेऱ्याला भेट दिली असता डेऱ्याचा प्रमुख पुना प्रभु रब्बारी याने समस्याचा पाढाच वाचून दाखविला. या डेऱ्यात १२ कुटुंब असलेल्या लोकांमध्ये कुटुंब प्रमुख प्रभु रब्बारी, सुरेश रब्बारी, रामा किशन रब्बारी, पाला जिवा रब्बारी, गोवा सोमा रब्बारी, रतन सोमा रब्बारी, जमा रवा रब्बारी, देवशी शामा रब्बारी, साजन भोला रब्बारी, रवा कुमार रब्बारी इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये एकूण ६0 लोकसंख्या आहे. पुरुष व महिलांसह बालकांचाही समावेश आहे. यांची दिनचर्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन शेळ्या-मेंढ्या व उंटाच्या मागे चालत राहणे व जिथे संध्याकाळ झाली, तिथे जंगलातच नदी नाल्याच्या काठावर आश्रय घेऊन पोटाची खडगी भरणे. या लोकांमध्ये नवजात बालकांपासून तर ८0 वर्षापर्यंतचे वृद्ध आहे.पाऊस, वारा, वादळ व विजेचा कडकडातही डोंगराच्या कुशीत त्यांना रात्र काढावी लागते. आमची प्रत्येक रात्र वैऱ्याची असते. जंगली जनावरे व चोरांचाही सामना करावा लागतो, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. १२ कुटुंबामध्ये एकूण ६0 लोकात लहान मुले आहेत. अनेकांचा जन्म जंगलातच झाल्याचीे गंभीर बाब लोकांनी बोलून दाखविली. प्रभु नारंग रब्बारी हा ८0 वर्षीय वृद्ध असून उभे आयुष्य त्याने वनवासातच घालविले.या समुदायातील अनेकजण अशिक्षित आहे. वणवण भटकून जीवन जगत असल्याने मुलांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. डेऱ्याचा प्रमुख रब्बारी याने सांगितले की मागील ५0 वषार्पासून पूर्ण भारतभर आम्ही भ्रमण करीत असतो, आम्ही सर्व गुजरात राज्याचे रहिवासी आहोत. दु:खाचे डोंगर उरात घेऊन जीवन जगणाऱ्यांवर शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.नाल्याच्या पाण्यावरच जनावरांचे व आपल्या कुटुंबाची तहान भागवावी लागते. सर्व कुटुंब जंगलातच वास्तव्य करीत असल्याने किराणा, राशन शहरातून जंगल मागार्ने १0 ते १५ किमी अंतरावरून आणावे लागते. गावोगावी भटकंती करणाऱ्या मेंढपाळ लोकांना गावात राहू दिले जात नाही. त्यामुळे ते गावाबाहेर किंवा नाल्यालगत आपला डेरा टाकतात. पिण्याच्या पाण्यासाठी दुसरे साधन नसल्याने नाल्यातील गढूळ पाणी प्यावे लागते. यामुळे अनेक व्यक्तींना आजार जडले आहे. असे असतानाही शासनाची आरोग्य यंत्रणा किंवा शासनाची कोणती योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.