शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चुकीने दिलेल्या पैशांची वसुली निवृत्तीनंतर नाही

By admin | Updated: March 19, 2015 23:24 IST

सरकारी कार्यालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणावरून दिलेल्या जादा पैशाची वसुली ते कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

अजित गोगटे - मुंबईसरकारी कार्यालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणावरून दिलेल्या जादा पैशाची वसुली ते कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच संबंधित कर्मचारी निवृत्त होण्याच्या वर्षभर आधीही त्याच्याकडून अशा प्रकारची वसुली करणे न्यायालयाने निषिद्ध ठरविले आहे.एवढेच नव्हे, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांकडून, त्यांना चुकीने दिल्या गेलेल्या पैशांची, केव्हाही व कोणत्याही कारणासाठी वसुली करणे कायद्याला धरून ठरणार नाही, असेही न्यायालयाने जाहीर केला आहे.सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांकडून चुकीने जादा पैसे दिले जाण्याच्या घटना अनेक वेळा घडत असतात. काही वेळा अशी चूक एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडलेली असते किंवा एखाद्या संपूर्ण कॅडरच्या पगार व भत्त्यांची फेररचना करताना अशी चूक होते. ही चूक बऱ्याच दिवसांनी व काही वेळा तर काही वर्षांनी लक्षात येते. मग चुकीने दिल्या गेलेल्या जादा रकमेची वसुली करण्याची कारवाई सुरु केली जाते.अशा वसुलीची अनेक प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल होतात व काही सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचतात. त्यांचा निकाल देताना न्यायालय प्रामुख्याने दोन निकषांचा विचार करते. एक म्हणजे, मुळात जादा रक्कम दिली जाण्यास कर्मचारी कारणीभूत आहेत का? म्हणजे कर्मचाऱ्यानेच लबाडी केल्याने किंवा चुकीची माहिती दिल्याने जादा रक्कम दिली गेली का? दोन, जादा रक्कम दिली जाण्याची चूक अनाहूतपणे व प्रामाणिकपणे झालेली असली व त्यात कर्मचाऱ्याचा काही दोष नसला तरी त्या रकमेची वसुली करणे न्यायाचे होईल का?खंडपीठाने या संबंधीचे निकालपत्र डिसेंबरमध्ये दिलेले असले तरी न्यायमूर्तींच्या स्वाक्षरीनंतर अलीकडेच ते सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.1 तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी वसुली.2 निवृत्त कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी वसुली अथवा निवृत्तीच्या वर्षभर आधी केली जाणारी वसुली.3 सलग पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चुकीने दिल्या गेलेल्या जादा रकमांची वसुली.4 कर्मचाऱ्यास चुकीने वरच्या पदाचे काम करण्यास सांगितल्याने त्यामुळे त्याला दिल्या गेलेल्या जादा पैशाची वसुली5 कार्यालयाचा वसुलीचा अधिकार आणि कर्मचाऱ्याची निरागसता यांचा तौलनिक विचार केला असता जी वसुली कर्मचाऱ्याच्या दृष्टीने अधिक अन्यायाची, कठोर अथवा मनमानीची ठरेल अशी वसुली.४सर्वोच्च न्यायालयाने आजवर अशा प्रकरणांमध्ये अनेक निकाल दिलेले आहेत. यापैकी प्रत्येक निकाल त्या त्या प्रकरणातील तथ्यानुरूप दिला गेला. असे असले तरी या सर्व निकालांमधून न्यायाच्या दृष्टीने काही सामायिक मुद्दे काढणे गरजेचे होते. पंजाबमधून आलेल्या अशाच शंभरहून अधिक अपिलांवर निकाल देताना न्या. जगदीश सिंग केहार व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने अलीकडे हेच काम केले. ४भविष्यात न्यायालायांना अशा प्रकरणांचा निकाल करणे सुलभ व्हावे यासाठी खंडपीठाने पूर्वी दिल्या गेलेल्या सर्व संबंधित निकालांचा संगतवार विचार करून प्रकरणाची तथ्ये काहीही असली तरी कोणत्या चार परिस्थितींमध्ये चुकीने दिल्या गेलेल्या पैशांची वसुली कर्मचाऱ्यांकडून करणे कायद्याला धरून होणार नाही, याचे ढोबळ नियम ठरवून दिले.