शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

By admin | Updated: October 14, 2015 14:01 IST

देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर आरक्षणाबाबतचे सध्याचे धोरण बदलण्यात येणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना द्यावी लागली होती. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर लगेच सारवासारव करण्याची वेळ आली होती. 
मात्र, गोरखपूर येथे संघ स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत यांनी आपण आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आरक्षणाचा फायदा ख-या गरजूंना मिळत नसल्याचे म्हटल्याचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे. त्यामुळे आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे त्यांनाच ते मिळेल याची काळजी घ्यावी अशी भूमिका भागवत यांनी मांडली आहे. 
भागवतांच्या गेल्या महिन्यातल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर व भाजपावर नितिशकुमारांनी जोरदार टीका केली होती आणि बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाने तात्काळ आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 
भाजपाच्या बिहारमधल्या सहकारी पक्षांची मदार मागासवर्गीय मतदात्यांवर असल्यामुळे आरक्षणला धक्का लावण्याची कोणतीही चर्चा भाजपाला बिहारमध्ये महाग पडू शकते. या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे.