शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

By admin | Updated: October 14, 2015 14:01 IST

देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर आरक्षणाबाबतचे सध्याचे धोरण बदलण्यात येणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना द्यावी लागली होती. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर लगेच सारवासारव करण्याची वेळ आली होती. 
मात्र, गोरखपूर येथे संघ स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत यांनी आपण आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आरक्षणाचा फायदा ख-या गरजूंना मिळत नसल्याचे म्हटल्याचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे. त्यामुळे आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे त्यांनाच ते मिळेल याची काळजी घ्यावी अशी भूमिका भागवत यांनी मांडली आहे. 
भागवतांच्या गेल्या महिन्यातल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर व भाजपावर नितिशकुमारांनी जोरदार टीका केली होती आणि बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाने तात्काळ आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 
भाजपाच्या बिहारमधल्या सहकारी पक्षांची मदार मागासवर्गीय मतदात्यांवर असल्यामुळे आरक्षणला धक्का लावण्याची कोणतीही चर्चा भाजपाला बिहारमध्ये महाग पडू शकते. या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे.