शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

By admin | Updated: October 14, 2015 14:01 IST

देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर आरक्षणाबाबतचे सध्याचे धोरण बदलण्यात येणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना द्यावी लागली होती. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर लगेच सारवासारव करण्याची वेळ आली होती. 
मात्र, गोरखपूर येथे संघ स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत यांनी आपण आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आरक्षणाचा फायदा ख-या गरजूंना मिळत नसल्याचे म्हटल्याचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे. त्यामुळे आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे त्यांनाच ते मिळेल याची काळजी घ्यावी अशी भूमिका भागवत यांनी मांडली आहे. 
भागवतांच्या गेल्या महिन्यातल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर व भाजपावर नितिशकुमारांनी जोरदार टीका केली होती आणि बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाने तात्काळ आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 
भाजपाच्या बिहारमधल्या सहकारी पक्षांची मदार मागासवर्गीय मतदात्यांवर असल्यामुळे आरक्षणला धक्का लावण्याची कोणतीही चर्चा भाजपाला बिहारमध्ये महाग पडू शकते. या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे.