शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नितीशकुमारांविरुद्ध बंडाचा झेंडा राज्यसभेसाठी बंडखोर रिंगणात

By admin | Updated: June 10, 2014 00:52 IST

संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे.

फराज अहमद/ नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे. जदयूच्या तीन बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना पक्षातील बंडखोरांचे आणि इतर पक्षांचे समर्थन आहे. जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री करण्यात आले असले तरी अंतिम निर्णय नितीश कुमार घेत असल्याने पक्षात असंतोष आहे. जदयूचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आहेत. लोकसभेत निवडून गेलेल्या रालोआच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेतील रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता.शरद यादव, वर्मा आणि बालयावी यांनी सोमवारी राज्य विधासभेत अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत नितीशकुमार, बिहार जदयूचे प्रदेशाध्यक्ष बशिष्ट नारायणसिंह आणि मुख्यमंत्री मांझी होते. बंडखोर उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबत जदयूचे बंडखोर आमदार होते. दरम्यान बंडखोर आमदारांनी शरद यादव यांच्या उमेदवारीला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. बंडखोर उमेदवारांमध्ये साबीर अली आहेत. अली हे एकेकाळी वरिष्ठ सभागृहात लोकजनशक्ती पार्टीचे एकमेव खासदार होते. त्यांनी एलजेपीला सोडचिठ्ठी देऊन जदयूसोबत घरोबा केला होता. त्यानंतर मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपात प्रवेश घेतला, परंतु भाजपाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांच्या विरोधामुळे त्यांना भाजपातून काढण्यात आले. दुसरे बंडखोर उमेदवार दिलीप जयस्वाल भाजपाचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना भाजपाने किसनगंज येथून लोकसभेचे तिकीट दिले होते. तिसरे बंडखोर उमेदवार व रिअल इस्टेटमध्ये मोठे नाव असलेल्या अनिल शर्मा यांनी जदयूकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपाचे बिहारमधील वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची बंडखोरांसोबत बैठक झाली. यावरून हे भाजपाचे राजकारण असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तीनही अपक्ष उमेदवारांनी भाजपाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांची भेट घेतली.