शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

रिझर्व्ह बँकेची अखेर माघार!

By admin | Updated: December 22, 2016 04:54 IST

५ हजार रुपयांहून अधिक रक्कम एकदाच बँकेत जमा करता येईल आणि तसे करताना प्रसंगी खातेदारांना स्पष्टीकरण द्यावे

नवी दिल्ली : ५ हजार रुपयांहून अधिक रक्कम एकदाच बँकेत जमा करता येईल आणि तसे करताना प्रसंगी खातेदारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, या रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि ग्राहकांत उमटलेली संतापाची लाट या पार्श्वभुमीवर ते निर्बंध मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतला. ही केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेची माघार आहे. 
आधी केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत लोकांना कितीही रक्कम जुन्या नोटांद्वारे भरता येईल, असे जाहीर केले होते. तसेच अडीच लाखांपर्यंत रक्कम भरल्यास त्याची चौकशी केली जाणार नाही, असेही नमूद केले होते. पण १९ डिसेंबर रोजी ही सवलत काढून घेताना निर्बंध घातल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या. 
सोमवारी काढलेल्या पत्रकात, ज्यांच्याकडे जुने पैसे शिल्लक आहेत त्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत एकदाच जमा कराव्यात. आतापर्यंत त्यांनी हे पैसे का जमा केले नाहीत याचा खुलासाही संबंधित व्यक्तीने करावा, असे पत्रक काढले होते. या निर्देशानंतर सरकारला सामान्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. 
दरम्यान, आरबीआयने आज सांगितले की, ज्यांच्या खात्याचे केवायसी आहे त्यांच्यासाठी हे निर्बंध नसतील. ज्यांच्या खात्याचे केवायसी पूर्ण नसेल अशा व्यक्ती ५० हजारांपर्यंतची रक्कम बँकेत भरू शकतील. आता केवायसी असलेला खातेदार जर पाच हजारपेक्षा अधिक जुन्या नोटांची रक्कम भरत असेल तर बँक अधिकारी त्याची विचारणा करणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)