शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्ड ‘आधार’ला जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2015 01:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी एक नवी पद्धती सुरू करण्याचे संकेत दिले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी एक नवी पद्धती सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारी योजनेचे लाभार्थी ओळखण्यासाठी २०१६ पर्यंत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डावर आधारित बायोमेट्रिक आॅथेंटिफिकेशन पद्धत अवलंबविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकारने काम सुरू केले आहे.राज्य सरकारच्या मदतीने केंद्राने दिल्लीतील ४४ दुकानांसह देशातील ५० हजार वितरण केंद्रावर बायोमेट्रिक आॅथेंटिफिकेशन पद्धत (जैविक वैशिष्ट्यावरुन ओळख पटविण्याचे तंत्र) कार्यान्वित केली आहे. देशात सुमारे ५ लाख स्वस्त धान्य दुकाने आहेत. डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत देशातील सर्व धान्य वितरण केंद्रावर बायोमेट्रिक आॅथेंटिफिकेशन पद्धत सुरू करण्यासाठी संगणकीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रॉकेवरील अनुदान कमी करण्याच्या राज्य व केंद्र सरकारच्या करारानंतर रॉकेलचे वितरणही बायोमेट्रिक आॅथेंटिफिकेशन पद्धतीने करण्याचा सरकारचा मनोदय आहे, असे या संदर्भातील काम पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रॉकेलवर सरकारला सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागते. (लोकमत न्यूज नेटवर्क)