शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!

By admin | Updated: June 13, 2016 06:23 IST

काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

चंदीगड : परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे.’गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’ ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून उद्भवलेल्या वादंगाबाबत ते म्हणाले की, ‘आपण हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, देशात अमली द्रव्यांचा व्यापार वाढला असून, तो थांबविला पाहिजे.’ तसेच ते म्हणाले की, ‘लालूजींनी रामदेव यांच्याबद्दल अपशब्द काढणे थांबविले आहे. त्यामुळे काही लोकांना ती बाब पसंत नाही.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांनंतरही आश्वासन तसेचयूपीए सरकारच्या काळात काळ्या पैशांसंदर्भात बाबा रामदेव यांनीच आंदोलन छेडले होते. लाखो कोटी रुपये परदेशात असून, भारतात परत आणले जावेत, यासाठी त्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. भाजपा सरकार केंद्रात असतानाही काळ्या पैशांची मागणी कायम आहे. भाजपाने निवडणुकीवेळी काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन जवळपास प्रत्येक भाषणातून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर काळा पैसा परत आल्यास, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही याची पूर्तता होऊ शकलेली नाही.