शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!

By admin | Updated: June 13, 2016 06:23 IST

काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

चंदीगड : परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे.’गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’ ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून उद्भवलेल्या वादंगाबाबत ते म्हणाले की, ‘आपण हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, देशात अमली द्रव्यांचा व्यापार वाढला असून, तो थांबविला पाहिजे.’ तसेच ते म्हणाले की, ‘लालूजींनी रामदेव यांच्याबद्दल अपशब्द काढणे थांबविले आहे. त्यामुळे काही लोकांना ती बाब पसंत नाही.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांनंतरही आश्वासन तसेचयूपीए सरकारच्या काळात काळ्या पैशांसंदर्भात बाबा रामदेव यांनीच आंदोलन छेडले होते. लाखो कोटी रुपये परदेशात असून, भारतात परत आणले जावेत, यासाठी त्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. भाजपा सरकार केंद्रात असतानाही काळ्या पैशांची मागणी कायम आहे. भाजपाने निवडणुकीवेळी काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन जवळपास प्रत्येक भाषणातून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर काळा पैसा परत आल्यास, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही याची पूर्तता होऊ शकलेली नाही.