शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!

By admin | Updated: June 13, 2016 06:23 IST

काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

चंदीगड : परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे.’गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’ ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून उद्भवलेल्या वादंगाबाबत ते म्हणाले की, ‘आपण हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, देशात अमली द्रव्यांचा व्यापार वाढला असून, तो थांबविला पाहिजे.’ तसेच ते म्हणाले की, ‘लालूजींनी रामदेव यांच्याबद्दल अपशब्द काढणे थांबविले आहे. त्यामुळे काही लोकांना ती बाब पसंत नाही.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांनंतरही आश्वासन तसेचयूपीए सरकारच्या काळात काळ्या पैशांसंदर्भात बाबा रामदेव यांनीच आंदोलन छेडले होते. लाखो कोटी रुपये परदेशात असून, भारतात परत आणले जावेत, यासाठी त्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. भाजपा सरकार केंद्रात असतानाही काळ्या पैशांची मागणी कायम आहे. भाजपाने निवडणुकीवेळी काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन जवळपास प्रत्येक भाषणातून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर काळा पैसा परत आल्यास, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही याची पूर्तता होऊ शकलेली नाही.