शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीवरून राज्यसभेत खडाजंगी

By admin | Updated: July 30, 2016 01:52 IST

देशात कोट्यवधी तरूण आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. प्रतिवर्षी २ कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते त्याचे काय झाले? रोजगाराची

नवी दिल्ली : देशात कोट्यवधी तरूण आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. प्रतिवर्षी २ कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते त्याचे काय झाले? रोजगाराची संधी मिळत नसल्याने देशातला तरूण वर्ग आज निराश व हताश आहे. राज्यसभेत शून्यप्रहरात जद (यु)चे नेते शरद यादव यांनी हा विषय उपस्थित करताच सत्ताधारी व विरोधकांमधे खडाजंगी झाली. आसनासमोर घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले.आपल्या मुद्याचे स्पष्टीकरण करतांना शरद यादव म्हणाले, भारतात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांना चटकन रोजगाराची संधी मिळते मात्र भारतीय भाषांमधे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. संघटीत क्षेत्रात २0११ साली ९ लाख लोकांना रोजगार मिळत होता आता ती संख्या ३ लाखांवर आली आहे. दिवसेंदिवस नोकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने देशात स्फोटक परिस्थिती आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा आणि माकपचे सिताराम येचुरींनी देखील बेरोजगारीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, रोजगार मिळण्यासाठी १00 योग्य उमेदवारांंपैकी फक्त १ व्यक्तिला रोजगार मिळतो ही आजची स्थिती आहे. तरूण पिढीच्या हताश मन:स्थितीचे हेच प्रमुुख कारण आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी त्यावर म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)