शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

रेल्वेच्या प्रवासी गाड्यांना 'कॉर्पोरेट'चे इंजिन

By admin | Updated: June 12, 2015 16:50 IST

रेल्वे गाड्याही खासगी कंपन्यांना चालवायला द्यावात अशी शिफारस मोदी सरकारने नेमलेल्या देवरॉय समितीने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - रेल्वेतील मालवाहतुकीत खासगी कंपन्यांचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आता प्रवासी रेल्वे गाड्याही खासगी कंपन्यांना चालवायला द्यावात अशी शिफारस मोदी सरकारने नेमलेल्या देवरॉय समितीने केला आहे. 
मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी रेल्वेतील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना यासंदर्भात निती आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. देवरॉय समितीचा अहवाल शुक्रवारी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून या अहवालात रेल्वेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एक्सप्रेस गाड्या खासगी कंपन्यांना चालवायला द्यायला पाहिजे, याच कंपन्या त्या गाडीची देखभाल दुरुस्तीही करतील अशी महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.याशिवाय रेल्वे डबे, इंजिनच्या निर्मितीमध्ये खासगी कंपन्यांचा समावेश करावा असे मत देवरॉय समितीने मांडले आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसून ही पद्धत बंद करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून वारंवार केली जात होती. देवरॉय समितीनेही याची दखल घेत रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. रेल्वे कामगार संघटनांनी यापूर्वीच रेल्वेतील खासगीकारणाला कडाड़ून विरोध दर्शवला असून देवरॉय समितीच्या या शिफारसी मोदी सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  देवरॉय समितीच्या शिफारशींवर महिनाभरात अंतिम निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
रेल्वेतर्फे देशभरात अनेक ठिकाणी शाळा, हॉस्पिटल्स चालवले जातात. या तोट्याच्या सेवांमधून रेल्वेने बाहेर पडावे, रेल्वेतील विविध विभागांमधील खात्यांमधील एकसूत्रता आणावी अशा शिफारशीही समितीच्या अहवालात करण्यात आल्या आहेत.