शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

राहुल यांची मोदी, ममतांवर टीका

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता

नियामतपूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता गिरवीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत आयोजित एका संयुक्त सभेत ते बोलत होते. मोदी यांच्यावर लक्ष्य साधताना ते म्हणाले, पंतप्रधान या देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसची सरकारे मनमानीपणे पदच्युत केली. देशात केवळ एकच नेता असावा आणि तो ते स्वत: असावेत अशी मोदींची इच्छा आहे. एवढेच नाहीतर येथील जनतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी थोपविण्याची मोहीमच राबविली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. मी संसदेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्या (ममता बॅनर्जी) जे सांगतात तेच होते. इतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे या नेत्यांचे म्हणणे असते. हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीत सुद्धा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (वृत्तसंस्था)अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी, जखमींना भेटले कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी केली. पीडितांचे सांत्वन करण्यासाठी मी येथे आलो असून, या मुद्यावर राजकारणाची आपली अजिबात इच्छा नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या या उड्डाणपूल अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे.राहुल गांधी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात जाऊन अपघातातील जखमींचीही विचारपूस केली. उड्डाणपुलाच्या बांधकामातील त्रुटींकडे लक्ष वेधले असता मी येथे जखमींच्या भेटीसाठी आलो असून, राजकारणावर बोलणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्षांनी स्पष्ट केले. भाजपने साधले शरसंधानउड्डाण पूल दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीत व प. बंगालमधे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर पकडला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी घटनास्थळी गेले. भाजपने मात्र या घटनेवर थेट शरसंधान करीत म्हंटले की छायाचित्राव्दारे स्वत:ची प्रसिध्दी घडवण्याची आणखी एक संधी राहुल गांधींनी साधली.