शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राहुल यांची मोदी, ममतांवर टीका

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता

नियामतपूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता गिरवीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत आयोजित एका संयुक्त सभेत ते बोलत होते. मोदी यांच्यावर लक्ष्य साधताना ते म्हणाले, पंतप्रधान या देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसची सरकारे मनमानीपणे पदच्युत केली. देशात केवळ एकच नेता असावा आणि तो ते स्वत: असावेत अशी मोदींची इच्छा आहे. एवढेच नाहीतर येथील जनतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी थोपविण्याची मोहीमच राबविली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. मी संसदेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्या (ममता बॅनर्जी) जे सांगतात तेच होते. इतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे या नेत्यांचे म्हणणे असते. हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीत सुद्धा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (वृत्तसंस्था)अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी, जखमींना भेटले कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी केली. पीडितांचे सांत्वन करण्यासाठी मी येथे आलो असून, या मुद्यावर राजकारणाची आपली अजिबात इच्छा नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या या उड्डाणपूल अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे.राहुल गांधी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात जाऊन अपघातातील जखमींचीही विचारपूस केली. उड्डाणपुलाच्या बांधकामातील त्रुटींकडे लक्ष वेधले असता मी येथे जखमींच्या भेटीसाठी आलो असून, राजकारणावर बोलणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्षांनी स्पष्ट केले. भाजपने साधले शरसंधानउड्डाण पूल दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीत व प. बंगालमधे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर पकडला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी घटनास्थळी गेले. भाजपने मात्र या घटनेवर थेट शरसंधान करीत म्हंटले की छायाचित्राव्दारे स्वत:ची प्रसिध्दी घडवण्याची आणखी एक संधी राहुल गांधींनी साधली.