शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

राहुल यांनी साधला पर्रिकरांवर निशाणा

By admin | Updated: August 1, 2016 01:40 IST

पर्रिकर यांनी अभिनेता आमिर खानवर टीका केल्यानंतर रविवारी काँग्रेसने पर्रिकर आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमिर खानवर टीका केल्यानंतर रविवारी काँग्रेसने पर्रिकर आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला. द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच विजय मिळवू शकत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली. दलित, अल्पसंख्याक, लेखक, अभिनेते आणि मोदी सरकारच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वट केले आहे की, आरएसएस आणि पर्रीकर हे प्रत्येकाला धडा शिकवू पाहत आहेत. येथे आपल्यासाठीही एक शिकवण आहे की, द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच जिंकू शकत नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानसारख्या बाहेरील शक्तींपासून देशाचे संरक्षण करणे हे पर्रिकर२२ यांचे काम आहे की, आमिर खानसारख्या देशातील अभिनेत्यांना धमकी देणे हे त्यांचे काम आहे? पर्रीकर यांचे वक्तव्य म्हणजे दलित आणि अल्पसंख्याकांविरुद्ध जे कारस्थान सुरू आहे त्याचा पर्दाफाशच यातून होत आहे. हाच राजधर्म आहे काय? असा सवालही यातून करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)>काय म्हणाले होते पर्रिकर?पुण्यात एका कार्यक्रमात पर्रिकर यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानवर टीका केली होती. एका अभिनेत्याने असे सांगितले की, त्यांची पत्नी देशाबाहेर जाऊ इच्छिते. जर मी गरीब असेल आणि माझे घर छोटे असेल तर काय झाले? तरीही मी माझ्या घरावर प्रेम करीन आणि त्या घराचा बंगला करण्याचे स्वप्न ठेवीन. देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा, असेही ते म्हणाले होते.