शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

राहुल यांनी साधला पर्रिकरांवर निशाणा

By admin | Updated: August 1, 2016 01:40 IST

पर्रिकर यांनी अभिनेता आमिर खानवर टीका केल्यानंतर रविवारी काँग्रेसने पर्रिकर आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमिर खानवर टीका केल्यानंतर रविवारी काँग्रेसने पर्रिकर आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला. द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच विजय मिळवू शकत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली. दलित, अल्पसंख्याक, लेखक, अभिनेते आणि मोदी सरकारच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वट केले आहे की, आरएसएस आणि पर्रीकर हे प्रत्येकाला धडा शिकवू पाहत आहेत. येथे आपल्यासाठीही एक शिकवण आहे की, द्वेष हे डरपोक व्यक्तींचे हत्यार आहे आणि ते कधीच जिंकू शकत नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानसारख्या बाहेरील शक्तींपासून देशाचे संरक्षण करणे हे पर्रिकर२२ यांचे काम आहे की, आमिर खानसारख्या देशातील अभिनेत्यांना धमकी देणे हे त्यांचे काम आहे? पर्रीकर यांचे वक्तव्य म्हणजे दलित आणि अल्पसंख्याकांविरुद्ध जे कारस्थान सुरू आहे त्याचा पर्दाफाशच यातून होत आहे. हाच राजधर्म आहे काय? असा सवालही यातून करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)>काय म्हणाले होते पर्रिकर?पुण्यात एका कार्यक्रमात पर्रिकर यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानवर टीका केली होती. एका अभिनेत्याने असे सांगितले की, त्यांची पत्नी देशाबाहेर जाऊ इच्छिते. जर मी गरीब असेल आणि माझे घर छोटे असेल तर काय झाले? तरीही मी माझ्या घरावर प्रेम करीन आणि त्या घराचा बंगला करण्याचे स्वप्न ठेवीन. देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा, असेही ते म्हणाले होते.