शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

राहुल गांधींच्या महायात्रेला प्रारंभ

By admin | Updated: September 7, 2016 04:38 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात पक्षासाठी प्रचाराची पार्श्वभूमी करणाऱ्या ‘किसान महायात्रा’ला प्रारंभ केला

रुद्रपूर (देवरिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात पक्षासाठी प्रचाराची पार्श्वभूमी करणाऱ्या ‘किसान महायात्रा’ला प्रारंभ केला. गांधी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव, वीज दरात कपात आणि कर्जमाफीचे आश्वासनही दिले. पूर्व उत्तर प्रदेशातील या गावातून त्यांनी रोडशो करून ही २,५०० किलोमीटरची यात्रा सुरू केली. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदी आणि त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा दबाब या यात्रेतून निर्माण केला जाईल, असे गांधी म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांचा जणू विसरच पडला आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी व दु:ख हलके करण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही परंतु आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. तुमच्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही आणि कोणतेही आश्वासनही दिले नाही. शेतकऱ्यांचे संरक्षण करा कारण ते देशाला अन्नधान्य देतात, असे मी मोदीजींना सांगितले. शेतकऱ्यांचे संरक्षण तुम्ही तीन मार्गांनी करू शकतात. एक म्हणजे त्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ करणे. आमचे सरकार असताना ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते हे तुम्हाला आठवत असेलच. आता काय घडतेय तर मोदी सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले परंतु ते मोठ्या उद्योगपतींचे. (वृत्तसंस्था)