शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या महायात्रेला प्रारंभ

By admin | Updated: September 7, 2016 04:38 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात पक्षासाठी प्रचाराची पार्श्वभूमी करणाऱ्या ‘किसान महायात्रा’ला प्रारंभ केला

रुद्रपूर (देवरिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात पक्षासाठी प्रचाराची पार्श्वभूमी करणाऱ्या ‘किसान महायात्रा’ला प्रारंभ केला. गांधी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव, वीज दरात कपात आणि कर्जमाफीचे आश्वासनही दिले. पूर्व उत्तर प्रदेशातील या गावातून त्यांनी रोडशो करून ही २,५०० किलोमीटरची यात्रा सुरू केली. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदी आणि त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा दबाब या यात्रेतून निर्माण केला जाईल, असे गांधी म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांचा जणू विसरच पडला आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी व दु:ख हलके करण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही परंतु आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. तुमच्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही आणि कोणतेही आश्वासनही दिले नाही. शेतकऱ्यांचे संरक्षण करा कारण ते देशाला अन्नधान्य देतात, असे मी मोदीजींना सांगितले. शेतकऱ्यांचे संरक्षण तुम्ही तीन मार्गांनी करू शकतात. एक म्हणजे त्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ करणे. आमचे सरकार असताना ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते हे तुम्हाला आठवत असेलच. आता काय घडतेय तर मोदी सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले परंतु ते मोठ्या उद्योगपतींचे. (वृत्तसंस्था)