शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By admin | Updated: March 3, 2016 05:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी काळा पैसा पांढरा करण्याची जी योजना सादर केली, त्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ही मोदींची फेअर अ‍ॅण्ड लवली योजना आहे. काळा पैसा असलेल्यांना तुरुंगात पाठवू, असे मोदी सांगतात. पण फेअर अ‍ॅण्ड लवली योजनेद्वारे त्यांनी काळ्या पैसेवाल्यांना सुटकेचा मार्गही दाखवला आहे, अशी टीका करून ते म्हणाले की, आम्ही सत्तेत येताच सारे काही स्वस्त करू, असे आश्वासन मोदी देत होते. पण यूपीए सत्तेत असताना ७0 रुपये किलो असलेली तूरडाळ आज २00 रुपयांवर गेली आहे. याला आश्वासनपूर्ती म्हणायचे की काय, असा सवाल करत, दोन वर्षांत तुमच्या सरकारने किती जणांना रोजगार मिळवून दिला, याचा जाब द्या, असे आव्हानच पंतप्रधानांना दिले. आमच्याकडे महात्मा गांधी आहेत, तुमच्याकडे सावरकर आहेत, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, तर तुम्ही हिंसेवर, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढताच भाजप सदस्यांनी उभे राहून गोंधळ सुरू केला. शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार अशा सर्वांवर हल्ले होत असताना पंतप्रधान गप्प बसून राहल्याबद्दलही गांधी यांनी आक्षेप घेतला. मोदी आजतागायत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान म्हणजे देश आणि देश म्हणजे पंतप्रधान असे कोणी समजू नये, असा टोला लगावून राहुल गांधी म्हणाले की राष्ट्रवाद आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आम्ही तिरंग्याला सलाम करतो, तेव्हा त्या कापडाला नव्हे, तर राष्ट्राला, राष्ट्रीय विचारांनाच सलाम करतो. जनता आणि राष्ट्र यांच्यात असलेले नात्यावर शंका घेउ नका, असेही ते म्हणाले.पाकिस्तानातील शासकांनी आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याचे नाटक केले. पण त्या शासकांचे जनतेशी असलेले नाते तुटून गेले. त्यामुळे आज आपण पाकिस्तान आणि बांगला देश असे दोन देश झाल्याचे पाहत आहोत. जनेतचे एकमेकांशी असलेले नाते जात, भाषा, प्रांत, धर्म अशा मुद्द्यांवर न तोडण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. अर्थात तसे आम्ही होउच देणार नाही, असा दावा करताना ते म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तानची कंबर ६ वर्षांत मोडून दाखवली होती. जगापासून पाकिस्तानला आम्ही व एकटे पाडले होते. पण मोदी मात्र ठरले नसतानाही चहा प्यायला पाकिस्तानात गेले. परिणाम काय, तर पठाणकोटमध्ये हल्ला झाला. यूपीएने सहा वर्षांत जे करून दाखवले ते मोदी यांच्या पाक भेटीमुळे बिघडून गेले, अशी जळजळीत टीकाही राहुल गांधी यांनी केली.