शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाकला खडसावले

By admin | Updated: January 24, 2015 02:39 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले.

दहशतवाद्यांचे नंदनवन नको : ओबामांचा स्पष्ट शब्दांत इशारा नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, किंबहुना ते अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, हे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकिस्तानला सोडले. भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत ओबामा म्हणाले, की आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास शिक्षा देण्याबाबत पाकिस्तानच्या गांभीर्याबाबत नव्याने सवाल उपस्थिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे.हल्ल्याचा सूत्रधार जकिउर रहमान लख्वीला पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून सवाल उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्युमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले. ओबामांनी ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही आमची सुरक्षा व आमच्या जीवन पद्धतीच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे आहोत, हे भारतीयांना सांगण्यासाठी आपण २०१०च्या दौऱ्यात सर्वप्रथम मुंबईच्या ताज हॉटेलला भेट दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीऐवजी आता देशाच्या अन्य भागांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यांना, विशेषत: जम्मू-काश्मीरला या गंभीर धोक्याबाबत सावध केले आहे. काश्मीरमध्ये २००० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्तीसिंहपुरा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ३६ जण ठार झाले होते. अशा प्रकारचा हल्ला या वेळीही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.