शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
6
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
7
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
10
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
11
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
12
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
13
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
14
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
15
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
16
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
17
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
18
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
19
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
20
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

पाकला खडसावले

By admin | Updated: January 24, 2015 02:39 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले.

दहशतवाद्यांचे नंदनवन नको : ओबामांचा स्पष्ट शब्दांत इशारा नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, किंबहुना ते अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, हे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकिस्तानला सोडले. भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत ओबामा म्हणाले, की आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास शिक्षा देण्याबाबत पाकिस्तानच्या गांभीर्याबाबत नव्याने सवाल उपस्थिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे.हल्ल्याचा सूत्रधार जकिउर रहमान लख्वीला पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून सवाल उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्युमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले. ओबामांनी ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही आमची सुरक्षा व आमच्या जीवन पद्धतीच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे आहोत, हे भारतीयांना सांगण्यासाठी आपण २०१०च्या दौऱ्यात सर्वप्रथम मुंबईच्या ताज हॉटेलला भेट दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीऐवजी आता देशाच्या अन्य भागांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यांना, विशेषत: जम्मू-काश्मीरला या गंभीर धोक्याबाबत सावध केले आहे. काश्मीरमध्ये २००० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्तीसिंहपुरा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ३६ जण ठार झाले होते. अशा प्रकारचा हल्ला या वेळीही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.