शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाकला खडसावले

By admin | Updated: January 24, 2015 02:39 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले.

दहशतवाद्यांचे नंदनवन नको : ओबामांचा स्पष्ट शब्दांत इशारा नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, किंबहुना ते अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, हे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकिस्तानला सोडले. भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत ओबामा म्हणाले, की आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास शिक्षा देण्याबाबत पाकिस्तानच्या गांभीर्याबाबत नव्याने सवाल उपस्थिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे.हल्ल्याचा सूत्रधार जकिउर रहमान लख्वीला पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून सवाल उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्युमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले. ओबामांनी ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही आमची सुरक्षा व आमच्या जीवन पद्धतीच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे आहोत, हे भारतीयांना सांगण्यासाठी आपण २०१०च्या दौऱ्यात सर्वप्रथम मुंबईच्या ताज हॉटेलला भेट दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीऐवजी आता देशाच्या अन्य भागांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यांना, विशेषत: जम्मू-काश्मीरला या गंभीर धोक्याबाबत सावध केले आहे. काश्मीरमध्ये २००० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्तीसिंहपुरा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ३६ जण ठार झाले होते. अशा प्रकारचा हल्ला या वेळीही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.