शहरं
Join us  
Trending Stories
1
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
4
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
5
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
6
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
7
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
8
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
9
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
10
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
11
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
12
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
13
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
14
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
15
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
16
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
17
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान
18
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
19
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! उरलेला चहा पुन्हा गरम करून पिता? आताच बदला सवय, अन्यथा...
20
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली

वैदर्भीय औदार्याने जिंकली पंजाबी मने!

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते

राजेश पुनूरकर, (संत नामदेव नगरी) -घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते आणि पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन घेण्यासाठी पुढच्या वर्षी नागपूरचे आमंत्रण देऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वैदर्भीय औदार्याचेही उदाहरण घालून दिले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभात शिख धर्मीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा अमृतस-घुमान- हरगोबींदपूर- तांडा या रस्त्याची घोषणा गडकरी यांनी केली. महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या या चार पदरी सिमेंटच्या रस्त्यासाठी तब्बल १८०० कोटी रुपयांचा निधी जाणारआहे. त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी नांदेडसाहेब ते आनंदपूरसाहेब या रस्त्याची मागणी केली. व्यासपीठावरूनच गडकरी यांनी त्याला मंजूरी असल्याचे सांगितले. यावर बादल म्हणाले, ‘‘ गडकरी यांनीआजपर्यंत पंजाबला कधीही विन्मुख केले नाही.’’बादल यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्याचे संमेलन ज्या पध्दतीने पंजाबध्ये झाले तसे पंजाबी साहित्याचे संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे भाषण संपल्यावर गडकरी यांनी व्यासपीठावरून पुन्हा एकदा पुढील वर्षीच पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन नागपूर येथे घेण्यासाठी आमंत्रण दिले. टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करण्यात आले. गडकरी यांनी आपल्या भाषणात पंजाब आणि महाराष्ट्राचे अनुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘‘ संत नामदेव केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते राष्ट्रीय संत आहेत. घुमानमध्ये गुरुद्वारा आणि मंदिर एकत्रित पाहून आनंद आणि समाधान वाटले. पंजाबने देशासाठी केलेले बलिदान हा देश विसरु शकत नाही. संत नामदेवांवर मराठी लोक प्रेम करतात आणि तितकेच प्रेम पंजाबी लोकही करतात. पंजाब आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कायम आहेत आणि भविष्यातही ते कायम राहतील. पंजाब आणि महाराष्ट्र यांची परंपरा, संस्कृती आणि इतिहास सारखा आहे. साहित्याबद्दल मराठी माणसाला जेवढे प्रेम आहे तेवढेच पंजाबी माणसालाही आहे. आज घुमान या गावी होणारा हा साहित्य संगम देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. केवळ भौतिक सुखाने काही लाभत नाही. संस्कारांची पेरणी समाजात कराी लागते. ते काम संत साहित्य करते. त्यामुळे जीवनाला दिशा मिळते. आम्ही त्याच विचाराने कार्य करतो.