शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय औदार्याने जिंकली पंजाबी मने!

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते

राजेश पुनूरकर, (संत नामदेव नगरी) -घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते आणि पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन घेण्यासाठी पुढच्या वर्षी नागपूरचे आमंत्रण देऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वैदर्भीय औदार्याचेही उदाहरण घालून दिले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभात शिख धर्मीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा अमृतस-घुमान- हरगोबींदपूर- तांडा या रस्त्याची घोषणा गडकरी यांनी केली. महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या या चार पदरी सिमेंटच्या रस्त्यासाठी तब्बल १८०० कोटी रुपयांचा निधी जाणारआहे. त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी नांदेडसाहेब ते आनंदपूरसाहेब या रस्त्याची मागणी केली. व्यासपीठावरूनच गडकरी यांनी त्याला मंजूरी असल्याचे सांगितले. यावर बादल म्हणाले, ‘‘ गडकरी यांनीआजपर्यंत पंजाबला कधीही विन्मुख केले नाही.’’बादल यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्याचे संमेलन ज्या पध्दतीने पंजाबध्ये झाले तसे पंजाबी साहित्याचे संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे भाषण संपल्यावर गडकरी यांनी व्यासपीठावरून पुन्हा एकदा पुढील वर्षीच पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन नागपूर येथे घेण्यासाठी आमंत्रण दिले. टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करण्यात आले. गडकरी यांनी आपल्या भाषणात पंजाब आणि महाराष्ट्राचे अनुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘‘ संत नामदेव केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते राष्ट्रीय संत आहेत. घुमानमध्ये गुरुद्वारा आणि मंदिर एकत्रित पाहून आनंद आणि समाधान वाटले. पंजाबने देशासाठी केलेले बलिदान हा देश विसरु शकत नाही. संत नामदेवांवर मराठी लोक प्रेम करतात आणि तितकेच प्रेम पंजाबी लोकही करतात. पंजाब आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कायम आहेत आणि भविष्यातही ते कायम राहतील. पंजाब आणि महाराष्ट्र यांची परंपरा, संस्कृती आणि इतिहास सारखा आहे. साहित्याबद्दल मराठी माणसाला जेवढे प्रेम आहे तेवढेच पंजाबी माणसालाही आहे. आज घुमान या गावी होणारा हा साहित्य संगम देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. केवळ भौतिक सुखाने काही लाभत नाही. संस्कारांची पेरणी समाजात कराी लागते. ते काम संत साहित्य करते. त्यामुळे जीवनाला दिशा मिळते. आम्ही त्याच विचाराने कार्य करतो.