शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

निषेधासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कुत्र्यांची हत्या, बांबूला बांधून काढला मोर्चा

By admin | Updated: September 27, 2016 13:32 IST

भटक्या कुत्र्यांमुळे होणा-या त्रासाला कंटाळून काँग्रेस यूथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 27 - भटक्या कुत्र्यांमुळे होणा-या त्रासाला कंटाळून काँग्रेस यूथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर कुत्र्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी एका बांबूला कुत्र्यांना बांधून शहरात मोर्चादेखील काढला. कोट्टयम शहरात ही घटना घडली आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे वाढलेले हल्ले आणि महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्या भुमिकेचा निषेध दर्शवण्यासाठी हे विकृत कृत्य करण्यात आले.
 
आंदोलक कार्यकर्त्यांनी मृत कुत्र्यांना पोस्ट ऑफिसपर्यंत नेलं. तिथे पोहोचल्यावर हे मृतदेह पार्सल करुन मनेका गांधींना पाठवण्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी टोकन म्हणून मृतदेह पोस्ट ऑफिसबाहेर ठेवले आणि त्या ठिकाणी मनेका गांधींचा पत्ता लिहून ठेवला. 
'भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना धोका असतानाही मनेका गांधी यांनी घेतलेली भुमिका संशयास्पद आहे,' असं युथ फ्रंटचे अध्यक्ष साजी मंजकडंबील यांनी सांगितलं आहे. 
'कुत्र्यांबद्द्ल आम्हाला द्वेष नाही. आमचा निषेध धोकादायक कुत्र्यांविरोधात होता. आमचा निषेध पाहून जिल्हाभरातील लोक अशीच भुमिका घेतील अशी अशा आहे,' असंही साजी मंजकडंबील बोलले आहेत. धोकादायक कुत्र्यांना कसं काय ओळखलं ? असा प्रश्न विचारला असता पाहून लक्षात येतं असा अजब दावाही त्यांनी केला.
कोट्टयम पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. '15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेलं नाही,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.