शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

एनडीटीव्हीवरील बंदीचा निषेध

By admin | Updated: November 5, 2016 05:53 IST

पठाणकोट हवाई दल तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कथित आक्षेपार्ह वार्तांकनाबाबत एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला नऊ नोव्हेंबर रोजी प्रसारण बंद ठेवण्याचा आदेश

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई दल तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कथित आक्षेपार्ह वार्तांकनाबाबत एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला नऊ नोव्हेंबर रोजी प्रसारण बंद ठेवण्याचा आदेश म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे थेट उल्लंघन आहे आणि ही बाब निषेधार्ह असल्याचे द एडिटर्स गिल्ड आॅफ इंडिया आणि ब्रॉडकास्टर्स एडिटर्स असोसिएशन यांनी म्हटले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रीगटाने घेतलेला हा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. जानेवारीत पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला असताना, एनडीटीव्ही इंडियाने अत्यंत महत्वाची व संवेदनशील उघड केल्याचा निष्कर्ष मंत्रीगटाने काढला होता. हे कारण पुढे करून, ९ नोव्हेंबर रात्री १ वाजल्यापासून दहा नोव्हेंबरच्या १ वाजेपर्यंत एनडीटीव्ही इंडिया वाहिनीचे प्रक्षेपण किंवा फेर प्रक्षेपण देशभर रोखण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल टीव्ही नेटवर्क (नियमन) कायद्याचा आधार घेतला आहे.एनडीटीव्हीने स्वत:वरील आरोपांचे खेडन केले आहे. सरकारने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसच्या उत्तरात एनडीटीव्हीने म्हटले आहे की आमचे वार्तांकन हे सौम्य होते आणि इतर वाहिन्यांनी जे दाखविले नाही ते आम्हीही दाखविलेले नाही. एनडीटीव्हीने सरकारच्या या निर्णयाचा धक्का बसला असल्याचे सांगून आम्हाला अन्य वाहिन्यांपासून वेगळे काढण्यात आले आहे. त्यामुळे अन्य पर्यायांचाही विचार करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>विरोधकांची सरकारवर टीकावाहिनीचे प्रसारण बंद करण्याचा सरकारचा निर्णय हा वृत्तपत्र व प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे थेट उल्लंघन असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका करताना हा निर्णय धक्कादायक व अभूतपूर्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सरकारच्या निर्णयाचा आपण धिक्कार करीत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ९ नोव्हेंबर रोजी सर्वच वृत्तवाहिन्यांनी प्रसारण न करण्याचे व वृत्तपत्रांनी प्रकाशित न होण्याचे धाडस दाखवून निषेध करावा, असे सुचविले आहे. सरकारवर या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका करून बुधवारी वाहिन्यांनी व वृत्तपत्रांनी आपापले काम बंद ठेवून निषेध करावा, असे आवाहन केले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सरकारवर शुक्रवारी टीका केली. ज्या चांगल्या दिवसांचे आश्वासन दिले गेले होते ते हेच का, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटरद्वारे विचारला.>आणीबाणीची आठवणदहशतवादी हल्ल्याच्या वार्तांकनाबाबत दूरचित्रवाणी वाहिनीचे प्रसारण बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून अशा घटनांत वार्तांकन कसे असावे याचे प्रमाण (नॉर्म्स) गेल्या वर्षी अधिसूचित करण्यात आले होते. द ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र काळजी व्यक्त केली असून तात्काळ तो मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारच्या आदेशामुळे आणीबाणीची आठवण होत असल्याची टीकाही असोसिएशनने केली आहे.