शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

रोहयोतील विहिरींना निधीची अडचण

By admin | Updated: April 20, 2015 01:42 IST

सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे.

वर्धा : सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे. या योजनेत जाचक अटी लादण्यात आल्या आहेत़ शिवाय निधीची अडचण असल्याने शेतकरीच संकटात सापडले आहेत़ कार्यालय गट ग्रा़पं़ हिवरा (कावरे) अंतर्गत असलेल्या कोल्हापूर (राव) या गावातील व परिसरातील लाभार्थ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कामे सुरू केलीत; पण निधी मिळत नसल्याने परिसरातील लाभधारक शेतकरी त्रस्त झाले आहे. संबंधित विभागाने मोजमाप करून विहिरीचे खोदकाम सुरू करा, असा तोंडी आदेश दिला. यावरून अल्प व अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन आपल्या विहिरीची कामे सुरू केली़ यात कामावरील मजुरांना आठवड्याचे पैसे द्यावे लागतात़ शासनाकडून निकषानुसार विहिरीचे पैसे काढताना वेळ होतो. यामुळे पैशासाठी मजूर थांबत नाहीत़ मजुरांना वेळेवर पैसे कुठून द्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. हे वर्ष आधीच शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. यामुळे काही शेतकरी परिस्थितीला झुंज देत आत्महत्या करीत आहे. विहिरीच्या लाभार्थ्यांवरही हीच वेळ आली आहे़ अशा या मंदीच्या काळात शासनाने सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीचा लाभ दिला; पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ निधी उपलब्ध होत नसल्याने गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे़ कर्ज घेऊन विहिरीच्या खोदकामाची मजुरी दिली; पण पूढील खर्च शेतकऱ्यांना झेपणारा नाही़विहिरीच्या कामाचे मोजमाप व संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी झाल्याशिवाय निधी मिळत नाही. संबंधित अधिकारी मात्र तिकडे भटकतही नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम २० ते २५ फुटापर्यंत झाले आहे; पण मोजमाप व पाहणी झाली नाही. यामुळे या विहीरीचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवळला जात आहे. कर्ज घेऊन विहिरीचे खोदकाम केले; पण निधी मिळणार की नाही, या साशंकतेमुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)