शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतील विहिरींना निधीची अडचण

By admin | Updated: April 20, 2015 01:42 IST

सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे.

वर्धा : सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे. या योजनेत जाचक अटी लादण्यात आल्या आहेत़ शिवाय निधीची अडचण असल्याने शेतकरीच संकटात सापडले आहेत़ कार्यालय गट ग्रा़पं़ हिवरा (कावरे) अंतर्गत असलेल्या कोल्हापूर (राव) या गावातील व परिसरातील लाभार्थ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कामे सुरू केलीत; पण निधी मिळत नसल्याने परिसरातील लाभधारक शेतकरी त्रस्त झाले आहे. संबंधित विभागाने मोजमाप करून विहिरीचे खोदकाम सुरू करा, असा तोंडी आदेश दिला. यावरून अल्प व अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन आपल्या विहिरीची कामे सुरू केली़ यात कामावरील मजुरांना आठवड्याचे पैसे द्यावे लागतात़ शासनाकडून निकषानुसार विहिरीचे पैसे काढताना वेळ होतो. यामुळे पैशासाठी मजूर थांबत नाहीत़ मजुरांना वेळेवर पैसे कुठून द्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. हे वर्ष आधीच शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. यामुळे काही शेतकरी परिस्थितीला झुंज देत आत्महत्या करीत आहे. विहिरीच्या लाभार्थ्यांवरही हीच वेळ आली आहे़ अशा या मंदीच्या काळात शासनाने सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीचा लाभ दिला; पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ निधी उपलब्ध होत नसल्याने गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे़ कर्ज घेऊन विहिरीच्या खोदकामाची मजुरी दिली; पण पूढील खर्च शेतकऱ्यांना झेपणारा नाही़विहिरीच्या कामाचे मोजमाप व संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी झाल्याशिवाय निधी मिळत नाही. संबंधित अधिकारी मात्र तिकडे भटकतही नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम २० ते २५ फुटापर्यंत झाले आहे; पण मोजमाप व पाहणी झाली नाही. यामुळे या विहीरीचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवळला जात आहे. कर्ज घेऊन विहिरीचे खोदकाम केले; पण निधी मिळणार की नाही, या साशंकतेमुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)