शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रोहयोतील विहिरींना निधीची अडचण

By admin | Updated: April 20, 2015 01:42 IST

सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे.

वर्धा : सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे. या योजनेत जाचक अटी लादण्यात आल्या आहेत़ शिवाय निधीची अडचण असल्याने शेतकरीच संकटात सापडले आहेत़ कार्यालय गट ग्रा़पं़ हिवरा (कावरे) अंतर्गत असलेल्या कोल्हापूर (राव) या गावातील व परिसरातील लाभार्थ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कामे सुरू केलीत; पण निधी मिळत नसल्याने परिसरातील लाभधारक शेतकरी त्रस्त झाले आहे. संबंधित विभागाने मोजमाप करून विहिरीचे खोदकाम सुरू करा, असा तोंडी आदेश दिला. यावरून अल्प व अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन आपल्या विहिरीची कामे सुरू केली़ यात कामावरील मजुरांना आठवड्याचे पैसे द्यावे लागतात़ शासनाकडून निकषानुसार विहिरीचे पैसे काढताना वेळ होतो. यामुळे पैशासाठी मजूर थांबत नाहीत़ मजुरांना वेळेवर पैसे कुठून द्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. हे वर्ष आधीच शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. यामुळे काही शेतकरी परिस्थितीला झुंज देत आत्महत्या करीत आहे. विहिरीच्या लाभार्थ्यांवरही हीच वेळ आली आहे़ अशा या मंदीच्या काळात शासनाने सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीचा लाभ दिला; पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ निधी उपलब्ध होत नसल्याने गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे़ कर्ज घेऊन विहिरीच्या खोदकामाची मजुरी दिली; पण पूढील खर्च शेतकऱ्यांना झेपणारा नाही़विहिरीच्या कामाचे मोजमाप व संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी झाल्याशिवाय निधी मिळत नाही. संबंधित अधिकारी मात्र तिकडे भटकतही नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम २० ते २५ फुटापर्यंत झाले आहे; पण मोजमाप व पाहणी झाली नाही. यामुळे या विहीरीचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवळला जात आहे. कर्ज घेऊन विहिरीचे खोदकाम केले; पण निधी मिळणार की नाही, या साशंकतेमुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)