शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे साधला जनतेशी संवाद

By admin | Updated: May 26, 2015 09:32 IST

मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ - मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. पहिल्या वर्षी विकास दर वाढल्याने देशाने गमावलेला विश्वास पुन्हा मिळवला आहे असे सांगत मोदींनी पत्राद्वारे 'मन की बात' केली आहे. 

मोदी सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले असून या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहीले आहे. देशभरातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये हे पत्र जाहिरात स्वरुपात छापण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक व धोरण आधारित प्रशासन हे आमचे मूलभूत सिद्धांत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. सत्तेवर आलो तेव्हा आर्थिक स्थिती डळमळीत होती, महागाई वाढत होती पण आता चित्र बदलत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मृदा आरोग्य कार्ड, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान अशा नवनवीन योजना राबवत असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.