शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे साधला जनतेशी संवाद

By admin | Updated: May 26, 2015 09:32 IST

मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ - मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. पहिल्या वर्षी विकास दर वाढल्याने देशाने गमावलेला विश्वास पुन्हा मिळवला आहे असे सांगत मोदींनी पत्राद्वारे 'मन की बात' केली आहे. 

मोदी सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले असून या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहीले आहे. देशभरातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये हे पत्र जाहिरात स्वरुपात छापण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक व धोरण आधारित प्रशासन हे आमचे मूलभूत सिद्धांत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. सत्तेवर आलो तेव्हा आर्थिक स्थिती डळमळीत होती, महागाई वाढत होती पण आता चित्र बदलत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मृदा आरोग्य कार्ड, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान अशा नवनवीन योजना राबवत असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.