शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 08:05 IST

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ सुरक्षा घ्यावी असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 29 - 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला होऊ शकतो. गुप्तचर खात्याने हल्ला होण्याची शक्यता वर्तवत नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं सागितंल आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ सुरक्षा घ्यावी असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. गुप्तचर खातं आणि विशेष सुरक्षा गटाने यासंबंधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत चर्चादेखील केली आहे.
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेला सल्ला नरेंद्र मोदींनी मान्य केल्यास ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मोदींच्या आसपास सुरक्षेचा मोठा फौजफाटा असेल. गतवर्षी नरेंद्र मोदींनी मोक्याच्या क्षणी बुलेटप्रूफ सुरक्षा न वापरता भाषण देण्याचा निर्णय घेतला होता. 
 
नरेंद्र मोदींवर हल्ला होण्यामागे काश्मीर हिंसाचार किंवा सीमारेषेवरुन वाढती घुसखोरी फक्त हीच कारणे नसल्याचं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.  सुरक्षा यंत्रणांनी मिळवलेल्या संभाषणात नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करत सुरक्षा भेदण्याची योजना आखण्यात आली आहे. तसंच इसीसचे वाढते हल्ले हादेखील चिंतेचा विषय असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे. 
 
गुप्ततर यंत्रणांनी एसपीजी आमि दहशतवादी विरोधी पथकांनी अगोदरच या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल कल्पना दिली आहे. देशभरात अनेक ठिकाणी करण्यात आले त्याप्रमाणे एकट्याने हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. अल-कायदा आणि इसीस लष्कर आणि पोलिसांच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती अगोदरच देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे. 
माजी पंतप्रधान इंदिरां गांधींच्या हत्येनंतर बुलेटप्रूफ काचेतून पंतप्रधानांनी भाषण देण्याची प्रथा सुरु झाली होती. पण 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भाषण दिलं, तेव्हा त्यांनी ही प्रथा मोडत बुलेटप्रूफ काच नाकारली होती, आणि भाषण दिले होते. 
 
इसीसव्यतिरिक्त अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद तसंच हिजबूल मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जेहादी-इस्लामी या दहशतवादी संघटना नरेंद्र मोदींवर हल्ला करु शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीजी, निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे एकूण 5 हजार जवान फक्त एकट्या लाल किल्ला परिसरात तैनात करण्यात आले आहेत. तसंच आकाशात नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने मदत घेतली जात आहे.